मुंबई : रविवारी मुख्यमंत्र्यांनी दोन डोस घेतेलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक मुंबईकर सर्व सामान्य चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, या अटीमध्ये आता अजून एका अटीची भर पडली असून, याबाबतची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज माध्यमांना दिली आहे.
“पंकजा मुंडे माझी बहीण, तिच्यावर अन्याय झाला असेल तर मला सांगावं, मी बघून घेतो”- महादेव जानकर
दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास पुरवण्यात येणार असून, हे एकप्रकारचे इम्युनिटी सर्टिफिकेट असेल, याच्या आधारेच तुम्हाला रेल्वे पास मिळेल. तसेच, दुसरा डोस घेतला असला, तरी तो डोस घेऊन १४ दिवसानंतरच ओळखपत्र दिलं जाईल. त्यानंतरच त्यांना लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे”, अशी माहिती त्यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना एकाच वाटेवर?
तसेच, याबाबत अधिक सांगताना ते पुढे बोलले, “रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यात ज्यांनी लसीचे २ डोस घेतले आहेत, त्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल, मात्र यात अजून एक अट अशी आहे, की दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस झाले असतील, तरच हा त्यांना हा पास मिळेल. रेस्टॉरंट, जीम, मॉल याठिकाणी या पासची गरज पडेल. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे गरजेचे आहे”, असे देखील त्यांनी सांगितले.
“खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…”, चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
यावेळी, “मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, सगळ्या महत्वाच्या रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठका झालेल्या आहेत. आमची या विषयावर तासभर चर्चा झाली. त्यांनी या गोष्टीला होकार दर्शवला. आपण मासिक पास दिला पाहिजे, क्यूआर कोड लावला पाहिजे, या गोष्टींवर आमची चर्चा झाली. सर्वांना विश्वासात घेऊनच हा निर्णय झाला आहे”, असं सांगत त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकरवर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
Read Also :
- नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- वाढदिवसाच्या मिरवणुकीत केलेला तलवारीचा नंगा नाच अबू आझमींना भोवला, १७ जणांविरोधात नोंदवला गेला गुन्हा
- …अन्यथा, 20 ऑगस्टला “अशोक चव्हाणांच्या घरापुढे मूक मोर्चा काढणार”संभाजीराजेंची घोषणा
- २०१४ पासून देशाला ग्रहण लागलं, लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात – नाना पटोले
- शिवसेना खासदार संजय जाधवांच्या १० मिनिटांच्या भाषणाने अधोरेखित केली राष्ट्रवादी-शिवसेनेतील दरी?