पालघर : प्रसाद लाड यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेना नेते संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसने सातत्याने मराठी माणूस आणि हिंदुत्वाला सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसशी हातमिळवणी करून पेढे वाटताना लाज वाटली नव्हती का?; असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
“मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ”- चित्रा वाघ
बेळगावचा पराभव राऊतांच्या जिव्हारी लागला आहे. पण राऊतांनी बेळगावात मराठीचा नारा देऊन चूक केली आहे. पराभाव झाल्या नंतर त्यांना पेढे खाल्याचे आठवलं. मला एकच गोष्ट संजय राऊतांना विचारायचं की, ज्या मराठी माणसाचा आणि हिंदुत्वाचा काँग्रेसने सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून पेढे वाटताना त्यांना लाज वाटली नाही का? काँग्रेसशी हात मिळवणून करून त्यानी हिंदुत्वाचा अपमान केला नाही का?, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला.
“संघर्षाचं कौतुक करायला हवं, पेढे काय वाटताय? हा आनंद तर…” राऊतांची खोचक टीका
बेळगावचा विजय हिंदूत्वाचं विजय आहे. बेळगावचा विजय मराठी माणसांचा विजय आहे. बेळगावचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय आहे. भाजपला हिंदुत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि मराठी माणसांचा कधी विसर पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. बेळगावचा विजय झांकी है मुंबई अभी बाकी है… भाजपचा विजय आणि शिवसेनेचा पराजय मुंबईला राऊतांना दिसायला लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरारसह इतर ठिकाणीही मराठी माणूस भाजपसोबत खंबीरपणे उभा राहील असं त्यांनी सांगितलं.
“भानगडी करणारेच सत्तेत होते, मग ईडी का कारवाई करेल?” भाजपाचं पवारांना प्रत्युत्तर
राऊतांनी केलेल्या चुका त्यांना दाखवता राहणार नाही. बेळगावचा निकाल मराठी माणसाचा निकाल आहे. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. पाठीत खंजीर कोणी घुसवला त्यांनाचं माहीत आहे. निवडणूक एकत्र लढून शरद पावरांशी हात मिळवणून कोणी केली हे जगजाहीर आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
Read Also :
- मोहन भागवतांच्या ‘सर्व धर्म एकचं आहेत’ विधानावर शरद पवारांनी लगावला टोला
- “सगळ्या दुरुस्त्या केल्या जातील”, ईडीच्या कारवाईवरून पवारांचा सूचक इशारा
- मराठवाड्यात पावसाचे थैमान : परभणीत पुराच्या पाण्यात बैलजोडी गेली वाहून
- “ते कुठले डॉक्टर तपासावं लागेल,” मोहन भागवतांच्या विधानावर पटोलेंची टीका
- बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? भारती पवार