मुंबई : मागासवर्गीयांच्या पदन्नोतेतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर दबाव टाकला जात असून, त्यामुळे आघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्यानंतर, काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिलं पाहिजे या मुद्यावर काँग्रेस ठाम असून, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा दिला आहे.
दरम्यान, आज या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकी आधी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाच्या संदर्भात पक्षाच्या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल, तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेअंती जो निर्णय महाविकास आघाडीकडून घेतला जाईल, तो आम्हाला मान्य असेल,” अशी भूमिका आता काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडली आहे.
मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालायने रद्द केल्यानंतर, ठाकरे सरकारने मराठा समाजाच्या वाढत्या रोषाला शांत करण्यासाठी ७ मे रोजी, यापुढे शासकीय सेवेत केवळ सेवाज्येष्ठतेनुसार आरक्षण देण्याचा आणि शासकीय सेवेतील पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर काढला होता. मात्र, यामुळे त्यांना मागासवर्गीय समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला असून, हा जीआर मागे घेतला नाही तर, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली होती. त्या अनुषंगाने या आजच्या कॅबिनेट बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Read Also :
- ‘राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’
- ‘सोनिया गांधीच्या पत्राचीही दखल नाही! आता आम्हाला विचार करावाच लागेल’
- ‘आघाडी सरकारवर पवार साहेबांचा वरदहस्त; त्यामुळे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार!’
- ‘पवार साहेब! मुख्यमंत्री, विरोधी पक्ष आणि नारायण राणे यांना एकत्र आणा’ – संभाजीराजे
- महाविकास आघाडीचे नाराजी नाट्य; पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर अजितदादांसह अनेकांची हजेरी