नवी दिल्ली : देशातील महामारीची स्थिती हाताळण्यावरून देशभरातून केंद्र सरकारवर टीका होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील मोदी सरकारला महामारीच्या नियोजनावरून फटकारले आहे. यातच दिल्ली सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा करताना योग्य पद्दतीने नियोजन केलं जात नसल्याचा आरोप करत, केंद्र सरकारविरोधात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, यासंदर्भातील सुनावणीदरम्यान केंद्राने गुरुवारी आपली बाजू मांडताना, देशातील जनतेनं दोनदा आम्हाला निवडून दिलं आहे. त्यामुळे आम्हाला देखील नागरिकांना महामारीमुळे होत असणाऱ्या त्रासाची काळजी वाटते, असे सांगत, ऑक्सिजनचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात करण्यासाठी राजकीय स्तरावर उच्च पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचं न्यायालयाला सांगितलं आहे.
तसेच, हा विषय वाद घालण्याचा नसल्याचं सांगूनही दिल्ली सरकारने हा वाद केंद्र विरुद्ध दिल्ली सरकार असा करुन ठेवल्याचा आरोप मेहता यांनी सरकारची बाजू मांडताना केला. आम्हाला फक्त दिल्लीतील लोकांची चिंता नसून देशातील सर्व जनतेची काळजी आहे, असा युक्तिवाद तयांनी सरकरकडून केला.
“ज्या पद्धतीने दिल्ली सरकारने, महाराष्ट्राला पुरवण्यात आलेला ऑक्सिजन आणि मुंबईला पुरवण्यात आलेल्या ऑक्सिजनची तुलना केली आहे, तशी तुलना होऊ शकत नाही, आम्हाला देशभरातील सर्वच ठिकाणांहून होणाऱ्या मागणीचा विचार करावा लागतो”, असंही मेहता यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं.
न्या. डी.व्हाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपिठासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता Solicitor General Tushar Mehta यांनी सरकारची बाजू मांडली. तसेच, दिल्ली सरकारकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उत्तर देऊ इच्छित नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
“When the third wave comes, how will you deal with it?
We are in stage 2 of the pandemic. Stage 3 might have very different parameters. If we prepare today, we will be able to handle stage 3,” Justice Chandrachud told Solicitor General Tushar Mehta.
“जेव्हा तिसरी लाट येईल, तेव्हा तुम्ही तिचा सामना कसा कराल?आम्ही (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या स्टेज 2 मध्ये आहोत. स्टेज 3 मध्ये कदाचित भिन्न पॅरामीटर्स असू शकतात. जर आपण आज तयारी केली तर आम्ही तिसरा टप्पा हाताळू शकू, ”न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले.