मुंबई : राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरचा देखील समावेश आहे. या निवडणुकांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोल्हापूरचे विद्यमान पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील हे सध्या या जागेवर आमदार आहेत.
एसटी महामंडळ कुणाच्या बापाजाद्याची जहागिरी नाही; गोपीचंद पडळकरांनी सरकारला खडेबोलं सुनावलं
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या आग्रहास्तव विधानपरिषदेची भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाडिकांची उमेदवारी निश्चित केली आहे.
“कृषी कायदे मागे घेतले त्याप्रमाणेच एकदिवस ED, CBI चा गैरवापर केंद्राने थांबवावा”
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेसाठी अधिकृत १०५ मतदार आहेत. जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे आणि प्रकाश आवाडे गट मिळून ही संख्या १५१ पर्यंत जाते. आम्हाला विजयासाठी आता फक्त आणि फक्त ५७ मतांची गरज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून मतदारांची संख्या ११८ आहे. त्यांना विजयासाठी तब्बल ९० ते १०० मतांची गरज आहे. काल उमेदवारी अर्ज भरताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी २७० मतांचा केलेला दावा हास्यास्पद आहे.
वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांना भाजपने दाखवला कात्रजचा घाट
विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार अमल महाडिक यांचा विजय निश्चित आहे; पण आम्ही गरजणारे नाही तर बरसणारे आहोत, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. काल आमदार प्रकाश आवाडे यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी ही भाजप, मित्रपक्षांची बैठक झाली. बैठकीला माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, राहुल आवाडे, जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समीत कदम उपस्थित होते. यावेळी अमल महाडिक यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Read Also :
- ‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’
- “आजची सकाळ मला अखंड हिंदुस्तानातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते”; संजय राऊत यांचे प्रतिपादन
- सोमय्यांचा अर्जुन खोतकरांवर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप, खोतकर म्हणाले…
- रत्नागिरीतील तब्बल ८६ एसटी कर्मचारी निलंबित; संपकरी कर्मचारी मात्र आंदोलनावर ठाम
- निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच कायदे रद्द करण्याची उपरती; राजू शेट्टींचा लेख व्हायरल