मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे . शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करून पूरपरिस्थितीची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावे लागेल, असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना जनताच धडा शिकवेल – अमित ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला पत्र लिहीत मदतीचे आवाहन केले. अतिवृष्टीमुळे कोकणातही मोठे नुकसान झाले. मात्र पूरग्रस्तांच्या पदरी निराशाच पडली. तात्काळ शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली.
एरवी आढेवेढे घेणारे राज्यपाल आज ठाकरेंच्या ‘या’ निर्णयावर करणार खुशी-खुशीने सही!
मुंबईतील खड्ड्यांवरूनही देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. रेल्वे बंद, वाहतूक कोंडी, 15 मिनिटांच्या प्रवासाला दीड तास लागतो. सरकारने कोर्टात खोटे प्रतिज्ञापत्रं दिले. मात्र आता सरकारची ही खेळी चालणार नाही. येत्या दोन तीन महिन्यात निवडणुका होत आहेत. त्यावेळी जनताच त्यांच्या न्यायालयात त्यांचा न्याय करेल, अशी टीकाही देशपांडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ पॉट होल्स ही राबविली होती. या मोहिमेची आठवण त्यांनी सरकारला करून दयावी. निदान त्यांच्या भीतीने तरी खड्डे बुजवले जातील, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झालाय – नवाब मलिक
शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरही देशपांडे यांनी भाष्य केले. शाळा सुरू होत नसल्याने मुलांची घुसमट होत असल्याचे ते म्हणाले आहेत . ईडीची कारवाई सुरु असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गायब आहेत, यावरूनही देशपांडे यांनी ठाकरे सरकरवर ताशेरे ओढले. शहराचा आयुक्त पळून जातो. माजी गृहमंत्री गायब होतो. जर काही केलं नाही तर घाबरत का आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Read Also :
- सेल्फी विथ खड्डे… घेणाऱ्या सुप्रियाताई आता कुठे आहेत? मुंबईतील खड्यावरून विरोधक आक्रमक
- शिवसेना खासदार भावना गवळी यांनी ७ कोटींची चोरी केली; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप
- शिवसेना नेते आनंदराव आडसुळांची तब्येत खालावली; दुसऱ्या रुग्णालयात हालवलं
- भाजप-मनसे युतीबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील; प्रविण दरेकरांच्या विधानाने चर्चांना उधान
- सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं; त्रीस्तरीय प्रभाग रचनेवरून दादांनी टोचले कान