राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी यांना टोला लगावला. कोरोना संकटाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये अशा शब्दात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
पवार म्हणाले की, या काळात राजकारण करण्यापेक्षा कोरोना काळात त्यांनी कामात लक्ष द्याव. तसंच कोरोना दूर कसा घालवता येईल ते बघावे. तसंच सध्याचा काळ हा कोणतंही राजकारण करण्याचा काळ नाही. यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचा आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यासोबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं ते म्हणाले.