शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुलाखती दरम्यान एक प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री असे म्हणाले होते की, तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सर्वांनीच उभे राहीले पहिजे. याच मुद्द्यावर आता राज्याचे महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील भाष्य केले आहे ते म्हणाले, सरकार म्हणून आम्ही तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांच्या पाठीशीच आहोत.
नागपूर महानगरपालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधींचा वाद राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. त्याचा शहराच्या विकासावरदेखील दुष्परीणाम होत असल्याची सांगितले जात होते कारण शनिवारी झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत आयुक्तांना पुन्हा एकाकी पाडण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले होते.
तसेच यावेळी थोरात यांना सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाबाबत विचारले असता, ‘त्या विषयावर माझा अभ्यास नाही, त्यामुळे उत्तर देणार नाही‘, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.
वीज बिलाच्या सवलतीवर देखील केले भाष्य
वीज ग्राहकांना बिलामध्ये सवलत कशी देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत या विषयावर चर्चा करणार असल्याचे बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री सतत आमदारांशी संवाद ठेवत असतात
उद्धव ठाकरे हे सहजतेने बोलणारे व्यक्तिमत्व आहे. समोरच्याला समजून घेण्याची त्यांची पद्धत उत्तम आहे. राज्यात सर्वांशीच त्यांनी चांगला संवाद ठेवला आहे. सरकारमधील मंत्र्यांशीच नव्हे तर सर्व आमदारांशी ते सातत्याने बोलत असतात असे देखील थोरात यांनी यावेळी सांगितले.