मुंबई : आम्ही ५० जण बाजीगर होतो. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका. आम्ही बाजीगर होतो, जातीवंत होतो, मरणाला न घाबरणाऱ्या आमच्या औलादी होत्या. त्यामुळे आमदारक्या आमच्यासाठी गौण आहेत. माणसानं प्रामाणिक असावं, हा खरा प्रश्न आहे. असं म्हणत बंडखोर आमदार शहाजीबापू पाटलांनी विरोधकांना सुनावलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.
“राष्ट्रवादीची तळी उचलून तुमच्या पक्ष प्रमुखांनी संपूर्ण पक्ष भिकेला लावला”
आमदारासाठी सगळ्यात आधी जनता असते, त्यानंतर नेता आणि मग पक्ष. सगळ्यात आधी जनतेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, कारण याच जनतेनं तुम्हाला मुंबईला पाठवलेलं असतं. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर प्रखरपणे टिका करताना दिसत आहेत. त्यांनी देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊतांसोबत आता शरद पवारांची देखील पत्राचाळ प्रकरणी चौकशी करा; भाजप आमदाराची मागणी
अजित पवारांवर टिका करताना ते म्हणाले की, तो अजित पवार पहाटेच मंत्रालयात येऊन बसायचा. अकरा वाजता मंत्रालय उघडायचं आणि हा बाबा सकाळी साडे सातलाच मंत्रालयात येऊन बसायचा. या काळात राष्ट्रवादीने सगळा निधी नेला, त्यांनी सगळी कामं नेली, सगळ्या योजना नेल्या. आम्ही मात्र मुख्यमंत्र्यांचे आमदार म्हणून मंत्रालयाच्या परिसरात तोंड बारीक करून हिंडत बसायचो.
गुजरातला उद्योगाचा पेटारा , महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा ” “गुजरात तुपाशी , महाराष्ट्र उपाशी”
याच एका कारणासाठी आम्ही ५० आमदारांनी ठरवून एकनाथ शिंदेना सांगितलं, काहीतरी निर्णय घ्या. अन्यथा येणारी विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक एवढी सोपी राहणार नाही. आपल्याला राष्ट्रवादीनं निम्मं गिळलं आहे, बाकीचं गिळल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही. यानंतर अखेर एकनाथ शिंदेंनी धाडस केला. असंही ते म्हणाले.
Read also
- पत्राचाळमधील सर्व पैसे राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपटात वळवले; इडीचा दावा, राऊत अडचणीत
- “पत्रावाळ चाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी व्हावी”, भाजपची मागणी, शरद पवार म्हणाले, “लवकर करा, नाहीतर..:”
- “तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय?” शिंदेंचा सवाल
- “तरुणांच्या हाताला रोजगार कधी मिळणार ते सांगा”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं
- “रामदास कदमांनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं”; सुषमा अंधारेंनी दिला कदमांना इशारा