नागपूर : भाजप-शिवसेना या दोन पक्षातील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत असून, भाजपचे नेते गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर आक्रमकपणे टीका करत आहेत. आज परत एकदा याचाच प्रत्यय आला. नागपूर येथे आज भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र डागले असून, ‘गेल्या विधानसभा निवडणुकीत आमची युती होती. मात्र, त्याचवेळी शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत छुपी युती केली आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसला,’ असा गौप्यस्फोट करत, ‘शिवसेनेला राज्यातून संपविल्याशिवाय भाजप राहणार नाही,’ असे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
हे पण वाचा, महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार?
तसेच, शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन भिन्न विचारधारा असलेले पक्ष आहेत. मात्र, कोणासोबत युती करायची हा त्यांचा निर्णय आहे. पण, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांआधीच शिवसेनेने, राष्ट्रवादीशी युती केली होती आणि हे मी जाणीवपूर्वक सांगतो आहे. त्यांनी आमच्यासोबत युती करून ही निवडणूक लढली आणि देवेंद्र फडणवीसांच्या करिश्म्याचा फायदा करून घेऊन, युती तोडली,’ असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे.
हे पण वाचा, ‘शिवसेनेने जिथे हिंदुत्व सोडलं तिथंच तर अंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली’
यावेळी, ‘शिवसेनेने महाराष्ट्राचे वाटोळे केल्याने आता जनता शिवसेनेला दारातही उभं करणार नाही. आज शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असली, तरी आगामी निवडणुकांत आम्हीच सरशी करू,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यात स्वबळावर निवडणूका लढवण्याची भाजप-काँग्रेसने तयारी दर्शवळील असून, आजच्या सामनातुन शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष, महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढतील, असे सूचक विधान करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Read Also :
- राष्ट्रवादीने मिळवला शिवसेनेच्या सूरात सूर! भाजप-काँग्रेसला ‘आऊट’ करण्यासाठी नवीन आघाडी उदयास येणार?
- ‘कुठे बाळासाहेबांची शिवसेना, कुठे सत्तेपाई सत्व गमावलेली ही शिवसेना’
- भाजप-शिवसेना वाद : किशोरी पेडणेकरांकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट, व्हिडीओत बाळासाहेब म्हणत आहेत…
- “शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा…”
- ‘शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता…’ संजय राऊत यांनी दिला भाजपला थेट इशारा