मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, “काँग्रेस येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढणार,” असा नारा देत आहेत. याचा समाचार आज, शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनामधून घेण्यात आला असून, काँग्रेस आणि नाना पटोलेंवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. दरम्यान, याला आता नाना पटोले यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हे पण वाचा, मोदीं विरोधात ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली एकवटणार विरोधी पक्ष? पवारांनी उद्या बोलावली १५ पक्षांची बैठक
“स्वबळाचा नारा फक्त आम्ही नाही, शिवसेनेनंही दिला आहे. पण राज्यात फक्त काँग्रेसलाच टार्गेट करण्याचं राजकारण सुरु आहे. मी कधीही सामना वाचला नाही. पण, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल, तर इतर कुणाला त्रास का व्हावा? आमच्यावर यावरून टीका होत असेल, तर आम्ही त्याला महत्व देत नाही. जयंत पाटील यांना आम्ही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी,” अशा शब्दांत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला उत्तर दिलं आहे.
हे पण वाचा, पाच वर्ष सरकार भक्कम; आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – नाना पटोले
तसेच, सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब बद्दल बोलताना, “त्यांच्या पत्र लिहिण्यामागचं मुख्य कारण, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आहे. भाजप, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास देत आहे, आम्ही हे पाहतोय. त्यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे, आम्ही त्याचा निषेध करत आहोत,” असं म्हणत त्यांनी, “पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्यावेळी राज्यात किंवा देशात राजकीय समीकरण बदलतात आणि राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात, तेव्हा त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामळे यात काही नवल नाही,” असं भाष्य त्यांनी, पवारांच्या दिल्लीवारीवर केलं आहे.
हे पण वाचा, “राष्ट्रवादी व काँग्रेसने, मोठ्या मनाने शिवसेनेला सांभाळून घेतलंय, त्यांच्या हे लक्षात असावं”
यावेळी त्यांनी, “बाळासाहेबांनी भाजपला बोट धरून महाराष्ट्रात मोठे केले. आज त्यांचाच मुलगा राज्याचा मुख्यमंत्री असताना, भाजपकडून खुर्ची काढण्याचा प्रयत्न केला जात आहे., हे किती निषेधार्थ आहे. जसा त्रास केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून, इतर पक्षातल्या नेत्यांना दिला जातो, तसाच भाजपच्या काही नेत्यांनाही दिला जात आहे. जे आणि जेवढे सांगितले जाते, तेवढेच आणि तेच बोलायचे, असं त्यांना सांगितलं जातं. यामुळे, अनेक खासदारांनी आत्महत्याही करायला सुरुवात केली आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
Read Also :
- बाळासाहेबांच्या बोटाला धरून भाजपा राज्यात वाढला त्याचा शिवसेनेला त्रास !
- “आमदार सरनाईक आणि त्यांचा लेटरबॉम्ब हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न”- देवेंद्र फडणवीस
- बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर हे चव्हाट्यावर आले – शिवसेना
- “मला वातावरण गरम करायला दोन मिनिटंही लागणार नाहीत, पण…”
- …शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय; गोपीचंद पडळकरांचा दावा