अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या Nilwande Dam पाण्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत. निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. शेतकरी गेल्या पाच दशकापासून ज्या निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट बघत आहेत त्या धरणाच्या कालव्यांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कालव्याच्या कामानंतर संगमनेर तालुक्यात उसाचे क्षेत्र अजूनही वाढणार आहे. बाळासाहेब थोरातांसारखा बरोबर घेवून जाणाऱ्या या नेत्यामुळे विकास कामाला अधीक गती मिळाली आहे.
आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी एकत्रित अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची आज पाहणी केली. आढळा नदीवरील बांधण्यात आलेल्या सेतू पुलाची पाहनी करत निधी कमी पडणार अशी ग्वाही या वेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीत.
निळवंडे धरणाच्या कालव्याची पहाणी करण्यासाठी ना.जयतं पाटील यांनी आज अचानक राहुरी येथे भेट दिली. या वेळी बोलताना ते म्हणाले की निळवंडे धरणाच्या Nilwande Dam कालव्याला कामाला आपण गती दिली आहे. या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही. यावर्षी पाचशे कोटी रूपये खर्च होतील अशी आपण अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. तसेच डिसेंबर २०२२ या वर्षात कालव्यांचे काम पुर्ण होईल आणि निळवंडे धरणातुन पाण्याचे आवर्तन सोडले जाईल.आणि हा परीसर सुजलाम-सुफलाम होईल असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी केले आहे.