तामिळनाडू : संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या प. बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने, भाजपचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. प.बंगालमध्ये भाजपनं आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र तिथे भाजपाला केवळ ७७ जागाच मिळाल्या, तर दुसरीकडं ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त २१३ जागा मिळाल्या आहेत
दरम्यान, या ठिकाणी तणमूल कांग्रेसला लक्ष्य करत भाजपनं २०० जागा जिंकण्याचा दावा केला होता. तसेच याठिकाणी सत्तेवर येण्यासाठी भाजपनं मोठा जोर लावला होता. मात्र अखेर राज्यात तृणमूलचीच सत्ता आली.
यावरून अनेकांनी भाजपवर, तसेच मोदी-शहा जोडीवर टीका केली असून, तामिळ अभिनेते आणि सध्या राजकारणात उतरलेले प्रकाश राज यांनी मोदींवर टीका करत, “खेळ झाला. पराभवाची धूळ चारली! प्रिय सर्वोच्च नेते, द्वेष आणि विषाणू पसरवणं थांबवा. नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे. चला आता चांगली दाढी करा आणि ज्या चुका केल्या आहेत, त्या निस्तरायला लागा” , शेवटी जीवन महत्त्वाचं आहे,” असं म्हणत प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
#KhelaHobe done n dusted ..Dear supreme leader.. citizens have called the bluff .. enough of spreading HATRED and VIRUS.. have a good shave n start undoing what you have done. 🙏🏻🙏🏻🙏🏻LIVES MATTER #justasking pic.twitter.com/C22JivuYRn
— Prakash Raj (@prakashraaj) May 2, 2021
अभिनेते प्रकाश राज यांचं हे ट्विट सध्या समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध होत असून, त्यावरून अनेकांनी पंतप्रधान मोदींची, तसेच भाजपची खिल्ली उडवली आहे.