दिल्ली : ‘हाय व्हॉलटेज’ ठरलेल्या प.बंगालच्या विधानसभेत मोदींना धूळ चारून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या, ममता बॅनर्जी या कालपासून दिल्लीमध्ये आहेत. काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर आज त्यांनी दिल्लीत येऊन, विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याच्या सिलसिला सुरूच ठेवला आहे. दरम्यान, यांनतर त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली.
पेगासस प्रकरणावरून भाजप विरोधात दिल्लीत एकवटले, महाविकास आघाडीसह सगळे विरोधक
“संसदेत काम होत नाही आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, ही सध्याची परिस्थिती आणीबाणीपेक्षाही भयानक आहे, फोन हॅक केले जात आहेत, फ्रिडम ऑफ प्रेसही उरलेलं नाही, पेगासस नावाचा खतरनाक देशभर पसरवण्यात आला आहे. त्यामुळे देशातल्या नागरिकांच्या आणि आमच्याही सुरक्षेला धोका पोहोचला आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
राज्य सरकारकडून १४ जिल्ह्यातील कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या हालचाली सुरु
तसेच, “आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं, सर्व विरोधक एकत्रित आल्यास ६ महिन्यातच देशात चांगले परिणाम दिसू लागतील,” असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, आप नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मी भेट घेणार आहे, सोबतच लालूप्रसाद यावद यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. सर्वांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
मोठी बातमी: संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या अंगावर कागद फेकले; १० खासदार निलंबित होणार?
यावेळी, “सोनिया गांधी यांनाही वाटतं. त्यामुळे. त्यांची भेट घेऊन, यावर एकत्र बसून चर्चा यावर करून निर्णय घेण्यात येईल. यावेळी जे राजकीय वादळ उठेल, त्याला कोणीच रोखू शकणार नाही. आता ‘खेला होबे’ची आरोळी संपूर्ण देशात ऐकायला मिळेल. ‘अच्छे दिन’ आम्ही पहिले आता ‘सच्चे दिन’ दाखवण्याची वेळ आली आहे,” असा सूचक इशारा त्यांनी मोदी सरकारला दिला आहे. मात्र, हे भाजपविरोधी पक्ष कोणत्या अटी शर्तींवर एकत्र येतील, ते एकत्र येतील का? आले तर किती वेळासाठी? हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
Read Also :
- प्रताप सरनाईक यांच्याविरोधात कारवाई होणार? उच्च न्यायालयाने दिले ईडीला आदेश
- …अन् देवेंद्र फडणवीस दरडग्रस्तांच्या मांडीला मांडी लावून बसले जेवायला!
- पुण्यातील रिंग रोडसाठी कोणत्याही प्रकारचा टोल घेतला जाणार नाही; एकनाथ शिंदे यांची माहिती
- खंडणी प्रकरणी परमबीर सिंग यांची होणार SIT चौकशी, ७ अधिकाऱ्यांच्याद्वारे केला जाणार तपास
- भाजपाला सत्तेपासून रोखण्यसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केले देशपातळीवर प्रयत्न सुरु