मुंबई – पश्चिम बंगाल निवडणूक झाल्यांनतर संपूर्ण देशभरात राजकीय पडसाद उमटले होते. परंतु भाजपने एवढे प्रयत्न करून देखील भाजपच्या पदरात पराभव कसा काय हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे, मात्र या प्रश्नाचं निरसन आता खुद्द शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. हे गुपित उलगडताना त्यांनी पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे.
तसेच मोदी-शहा पश्चिम बंगालमध्ये का हरले? याचं गुपित सांगतानाच पश्चिम बंगालमधील भाजपची राज्यक्रांती का फसली? याचा उलगडा देखील संजय राऊत यांनी केला. (West Bengal poll results show Modi-Shah not invincible)
शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील रोखठोक या स्तंभाद्वारे संजय राऊत यांनी भाजपच्या पश्चिम बंगालमधील पराभवाची पुनरावलोकन केलं आहे. हे करताना त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्या देवी होळकर यांच्याशी केली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीचे फलित काय? पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला ममता बॅनर्जी यांच्या बरोबरीत आणून ठेवले. ते देशाचे पंतप्रधान. सर्वोच्च नेते म्हणून वागले नाहीत. त्यामुळे बंगालच्या लोकांना मोदींचे अप्रूप वाटले नाही व ममतांसमोर उभ्या राहिलेल्या मोदींचा पराभव सहज झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- आदित्यला मंत्रिपद दिलं त्याच तत्परतेने बहुजनांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोग्यमंत्र्यांवर होतोय “हा” आरोप, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे चौकशीचे आदेश
- “सांगा योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?”, फडणवीसांना जयंत पाटलांचा थेट सवाल
- राज्यातल्या “या” महत्वाच्या प्रश्नांवरून विशेष अधिवेशन बोलवा, दरेकरांची मागणी
- मराठा आरक्षणासाठी पाऊल पडणार पुढे? आघाडी सरकार “हा” मोठा निर्णय घेण्याची शक्यता