मुंबई: सळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतून राज्य सावरण्याचा प्रयत्न करत असताना एका बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. तळिये-चिपळूणपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेडपर्यंत जेथे जेथे जलप्रलयाने नुकसान केले त्या प्रत्येक घरात मदत पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकारला शर्थ करावी लागेल. परंतू विरोधकाकडून यावर टीका करण्यात येत आहे.
हे पण वाचा: नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल तर तो त्यांचा प्रश्न, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून दरडी कोसळण्याच्या दुर्घटनेवर टीका करण्यात आली आहे. आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी काय बोलावे, केंदारकडून काय आणायचे ते आणा स्वागतच आहे.
हे पण वाचा: ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
जोरदार पावसामुळे पूरग्रस्त भागात मदतकार्यात अडथळे निर्माण झाले, पण या अडथळ्यांतून सरकारी यंत्रणा मार्ग काढत असताननाच राजकीय पर्यटनाने यंत्रणेलाच धारेवर धरायला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून सरकारी यंत्रणेस कामाला जुंपत असतानाच तिकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि माजी मंत्री महाजन हे धावाधाव करत महाडला पोहोचायचा प्रयत्न करू लागले. शेवटी पाण्याच्या प्रवाहात त्यांना गटांगळ्या खाव्या लागल्या आणि सरकारी यंत्रणेला होड्या वगैरे घेऊ त्यांना वाचवावे लागले असं सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे.
हे पण वाचा: “राज ठाकरेंचा मलाही फोन”, भाजपच्या बड्या नेत्याचा खुलासा; राज-भाजप भेटीची तारीख ठरली?
नुकसानग्रस्तांना ज्या प्रकारची मदत हवी ती केंद्राकडून मिळेल, आम्ही पहायला आलो नाही, सर्वतोपरी मदतही देणार असे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यांचे हे विधान समजदार नेत्याचे नाही, पण आम्ही ते चांगल्या अर्थाने घेतो. नुकसानग्रस्तांना, पूरग्रस्तांना सर्वतोपरी केंद्र सरकार मदत करेल असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने करावे का? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.
Read Also :
- भूस्खलनामुळे बाधित गावांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात….
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावर, तळीये ग्रामस्थांची करणार विचारपूस
- आपत्तीग्रस्तांना पुनर्वसनासाठी तातडीने मदत करा, केवळ इच्छाशक्ती दाखवून चालणार नाही, राज्य सरकारकडे दरेकरांची मागणी
- नारायण राणे पांढऱ्या पायाचे म्हणूनच कोकणावर संकट, मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
- ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार