राज्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता संपूर्ण राज्यात ३१ जुलै पर्यंतच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता ३१ जुलै ला अवघे ६ – ७ दिवस राहील असताना आता मुख्यमंत्री काय निर्णय गफहेणार याकडे सातवांचे लक्ष लागले होते. त्यातच काल झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ जुलैनंतर निर्बंध शिथील केले जाणार आहेत अशी माहिती दिली आहे.
३१ जुलैनंतरचं धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सूचनांची वाट पाहणार आहे. “निर्बंध शिथील होतील, तसंच राज्यांना निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. केंद्राच्या सूचनांवरच राज्याचा निर्णय आणि मार्गदर्शक सूचना अवलंबून असतील”. असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी लॉकडाउन हा शब्द वापरत नाही आहे. मी याला अनलॉकडाउन असं म्हणत आहे. सध्या असलेले निर्बंध शिथील केले जातील. आपण सध्या मुंबई महानगर प्रदेशातील आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे जास्त काळजी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.