मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. या संपातून तोडगा काढण्यासाठी, एसटी कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळावं म्हणून एक छान पॅकेज दिलं आहे. परिवहन मंत्र्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. साधारणपणे कमीतकमी 5 हजार रुपये पगार वाढले आहेत. याची तरतूद राज्य सरकार करणार आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल कामगारांसमोर, मीडियासमोर एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वकील गुणरत्न सदावर्तें यांच्यावर घणाघाती टीका केलीये. कामगारांचे नेते संप चिघळवत असतील तर ते कामगारांसाठी चांगलं नव्हे, असंही संजय राऊत म्हणाले.
खोत-पडळकरांनी आंदोलन सोडलं, पण आंदोलक एसटीची घंटी वाजू देणार नाही..
सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा विषय दिवसेंदिवस आणखी चिघळत आहे. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. त्यावर आज संजय राऊत यांनी मीडियापुढे त्यांची प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी कामगारांनी समजून घ्यायला हवं, असं आवाहन केलं. तर त्यांनी गुणरत्न सदावर्तें यांच्यावरही टिकास्त्र सोडलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा पण गिरणी कामगार करणार का? संजय राऊतांचा हल्लबोल
कामगारांचे नेते आणि त्यांना पाठबळ देणारे राजकीय पक्ष हा संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांच्या कुटुंबाचं नुकसान करत आहेत. एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? असं करु नका. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री, आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत संवेदनशील आहोत. कामगांरांच्या लढ्यातून मंबई आम्हाला मिळाली. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसून सुद्धा पॅकेज देण्यात आलं आहे. कामगार समजूतदार आहेत.महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल त्या कामगारांसमोर, मीडियासमोर एकेरी उल्लेख करता तुमचं कतृ्त्व काय आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली. कामगारांचे नेते संप चिघळवत असतील तर ते कामगारांसाठी चांगलं नव्हे, असंही संजय राऊत म्हणाले.
Read Also :
- आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; हिंगोलीतील शेतकऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘तुटेपर्यंत ताणू नका, एकदा तुटलं तर जोडणार नाही’; अनिल परब यांचा इशारा
- स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला झटका; राष्ट्रवादीने उचललं मोठं पाऊल..
- ‘देशमुखांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात रुजू झालो’; सचिन वाझेंचा खळबळजनक जबाब
- माझा पराभव झाला, म्हणून कट कारस्थान करणाऱ्यांनी धिंगाणा घातला; शशिकांत शिंदेंचा आरोप