शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावात फरक काय, असा प्रश्न खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितला. उद्धव हे मुख्यमंत्री आहेत. कोरोना लाॅकडाऊनच्या काळात त्यांची निर्णयप्रक्रिया पाहिली. ते अधिक सावधगिरीने निर्णय घेतात. बाळासाहेब ठाकरे हे तडकाफडकी निर्णय घ्यायचे, असे स्वभाववैशिष्ट्य पवार यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे मत व्यक्त केले. कोरोनाच्या काळात बाळासाहेबांच्या एका गुणाचा मला उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब घराबाहेर पडायचे नाहीत. पण बाहेरच्या प्रत्येक गोष्टींवर त्यांचे लक्ष असायचे. तसेच मला कोरोनाच्या काळात करावे लागले.
लॉकउनसंदर्भातील भूमिकेवरुन पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद होते यासंदर्भात विचारले असता त्याचा पवार यांनी इन्कार केला. लॉकडाउनमुळे अॅक्टीव्हीटी थांबल्या आहेत आणि या अॅक्टीव्हीटी थांबल्याचा परिणाम जसे वेगवेगळ्या घटकांवर झाले तसे वृत्तपत्रांवर झाले. मुख्य म्हणजे त्यांना जे वृत्त हवे असते ते वृत्त देणारे कार्यक्रम कमी झाले. म्हणून मग जागाभरण्यासाठी अशा बातम्या दिल्या गेल्या. याच्यात आणि त्याच्यात नाराजी आहे. मीच मागील काही दिवसांपासून वाचतोय की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. पण हे यत्किंचितही सत्य नाही. पण त्यात सत्य नाही, असे पवारांनी स्पष्ट केलं आहे.