नवी दिल्ली : केंद्र सरकार सध्या दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय दुग्धविकास मंत्र्यांना एक पत्र लिहून त्यात आयात न करण्यास सांगितलं आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसेल अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…रोशनी शिंदेंचा आनंद दिघे होण्याची भीती, ‘त्या’ अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? माजी महापौरांचा ठाकरेंवर गंभीर आरोप
शरद पवार यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज मी टाईम्स ऑफ इंडीया मधील एक बातमी वाचायला मिळाली. ज्यामध्ये केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाचा लोणी आणि तुप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा इरादा आहे. या संदर्भात केंद्र सरकारचा कोणताही निर्णय घेतला तर आम्ही निषेध करू. कराण उत्पादनांच्या आयातीचा थेट देशांतर्गत दुध उत्पादकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. दुग्ध उत्पादक शेतकरी अलीकडेच कोवीड संकटातून बाहेर आले आहेत. आणि अशा निर्णयामुळे डेअरी क्षेत्राच्या पुनरूज्जीवन प्रक्रियेला गंभीरपणे अडथळा निर्माण होईल. कृपया मी जी चिंता करतो. ती गांभीर्याने घ्या. असं शरद पवार यांनी म्हटलं.
हेही वाचा..“सुषमा अंधारे अन् राखी सावंत बहिणी-बहिणी, सनसनाटी पसरवणाऱ्यामध्ये त्यांच्यात स्पर्धा,” भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ते पंतप्रधान मोदी भारताला आत्मनिर्भर करतील वगैरे मोठमोठे दावे थोडे बाजूला ठेवा. सध्या मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय मंत्रालय दूग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या विचारात आहे. यातून देशातील दूध उत्पादकांना मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. याबाबत आदरणीय शरद पवार साहेबांनी संबंधित मंत्र्यांना एक पत्र लिहून आयातीचा निर्णय न घेण्याची विनंतीही केली आहे. २०११ साली देशात शेवटचे दूग्धजन्य पदार्थ आयात करण्यात आले होते.
हेही वाचा…“प्रत्येक जीव फेसबुक लाईव्हमुळे वाचला, त्यामुळे आपले उद्धव साहेब ‘कुटूंब प्रमुख’ झाले”, आदित्य ठाकरे
त्यानंतर २०१४ साली भाजपाची सत्ता आली आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे दावे जवळपास एक दशक होत असतानाही तुम्ही करतच आहात. आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा कृषी विभागाची सूत्रं हाती घेतली तेव्हा देशाला निर्यातीची दारं खुली केली. गहू, फळे, तांदूळ, भाज्या, दूध अशा अनेक गोष्टीत देशाला जगामध्ये पहिल्या यादीत आणलं. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी अशा कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे बिनबुडाचे दावे करणे आता थांबवा. अशी टिका राष्ट्रवादीने भाजपवर केली आहे.
Today I came across a news in the Times Of India, a newspaper (a news cutting is attached herewith) revealing the intention of the Union Ministry of Animal Husbandry and Dairy to import Dairy products like Butter and Ghee.
Any decision by the Central Government in this regards… pic.twitter.com/VavCJJ8fuN
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 6, 2023
Read also
हेही वाचा…“कृपया मी जी चिंता करतो, ती गांभीर्याने घ्या,” शरद पवारांचं थेट केंद्र सरकारला “त्याबाबत” पत्र
हेही वाचा..रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महिला आयोग पोलिसांच्या अहवालावर असमाधानी
हेही वाचा…“माझ्यावरही अगदी खालच्या पातळीवर टिका झाली, परंतु फडणवीस यामुळे व्यथीत होणार नाहीत”, पंकजा मुंडे
हेही वाचा…रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी सेनेच्या दोन महिला खासदार भिडल्या, थेट गृहमंत्र्यांची घेतली भेट
हेही वाचा…“सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावला”, दुर्गा भोसले-शिंदेंच्या निधनानंतर आदित्य ठाकरे भावूक