सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचं पॅकेज… कुठे जातं कुणालाच माहीत नाही… मला अशी थोतांड येत नाही. मला खोटं बोलता येत नाही जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडीकरांना दिली.
“घटना समुद्रात बुडावा” म्हणणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेड आक्रमक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूराने प्रचंड नुकसान झालेल्या भिलवडीला भेट दिली. यावेळी छोटेखानी सभा पार पडली. या सभेला ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना सरपंचांच्या वतीने निवेदनही देण्यात आलं. कोरोनाचं संकट आणि पुराचं संकट या दोन्ही संकटाचा आपण सामना करत आहोत. त्यामुळे अशी गर्दी करू नका. कोरोनाचं संकट आणि कोसळलेलं दु:ख याची मला कल्पना आहे. तुमच्या व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे. ते ते आम्ही करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
तु फक्त निवडणुक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील, तुला गाडतील; भाजप आमदारावर शिवसेना खवळली
अतिवृष्टी होणार हा अंदाज आला होता. तेव्हापासून सरकार कामाला लागलं होतं. जिथं शक्य होईल. तिथे लोकांचं स्थलांतर केलं जाईल. या पट्ट्यातील काही लाख लोकांचं स्थलांतर केलं आहे. जीवितहानी होऊ नये हे प्राधान्य होतं. अनेकांना घरं सोडून जावं लागलं. हा काही आनंदाचा भाग नाही. पण नदी कुठपर्यंत फुगली होती. अनेकांच्या घरात पाणी गेलं. संसार उद्धवस्त झाले. शेतीचं नुकसान झालं. घराचं नुकसान झालं. आर्थिक नुकसान झालं हे दरवर्षी होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावा लागेल. तुमचं पुनर्वसन करावं लागेल. त्यासाठी तुमची साथ लागेल. आपण पाण्याच्या पातळी मोजत बसण्यासाठी आपलं आयुष्य नाही. दरवर्षी पूर येतो. घरदार उद्धवस्त होतं. पुन्हा संसार उद्धवस्त आणि पुन्हा खर्च होतं… असं आपल्याच राज्यात निर्वासितासारखं राहणं योग्य नाही. पण म्हणून कायम स्वरुपी तोडगा काढू, असंही त्यांनी सांगितलं.
आम्हाला वाट्टेल तिथे कार्यालय उभं करू, मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेना लिहिलेलं नाही!
तळीयेत तर डोळ्यादेखत दरड कोसळून घरातील माणसं गेली. हे संकट आपल्यावर कोसळलं. या संकटाच्या मालिका आहेत. त्यातून मार्ग काढणारच, असं सांगतानाच पूर आणि दरडीमुळे किती नुकसान झालं याचा अंदाज घेत आहोत. किती नागरिकांना मदत करायची आहे. किती घरे उद्धवस्त आहे. शेतीचं किती नुकसान झालं आहे याची माहिती घेत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- बीडीडी चाळ पुनर्विकास: सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट?
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
- मुंबईतील मराठी आवाज टिकला आणि दिसला पाहिजे, बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस राज्यसरकार जबाबदार, एमपीएससीच्या जागेवरुन विद्यार्थी आक्रमक
- “सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल’’ सामनातून भाजप आमदारावर टीका