5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या मुद्यावर आता राजकारण चांगलेच तापू लागले आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनाचा पंतप्रधान मोदी सहभागी झाल्यास ते पंतप्रधानांच्या घटनात्मक शपथेचे उल्लंघन होईल, असे म्हणत टीका केली होती. आता ओवेसी यांनी भाजपचे युवा खासदार तेजस्वी सुर्या यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते ?, असा सवाल सुर्या यांनी केला आहे.
When Presidents of India & CM’s of states were organising Iftaar parties in official capacity, in official residences where was your ‘secularism’?
Masjid was built by razing the temple. That mistake is now reversed.
P.S We don’t need lessons in constitutionalism from Razakars. https://t.co/1vk9I2zvIe
— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) July 28, 2020
तेजस्वी सुर्या यांनी ओवेसी यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले की, जेव्हा देशाचे राष्ट्रपती आणि राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या अधिकृत निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे, तेव्हा तुमची धर्मनिरपेक्षता कुठे होती ? मंदिर पाडून मशीद बांधली गेली होती. ती चूक आता दुरुस्त करण्यात आली आहे. आम्हाला रझाकारांकडून राज्यघटना शिकण्याची गरज नाही.
दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजनाचा वाद चांगलाच वाढला असून, ओवेसी यांनी पंतप्रधान या भूमिपूजनाला जाणे चुकीचे आहे. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया, असल्याचे म्हटले आहे.