मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे सध्या राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर कडाडून टिका करण्यास सुरूवात केली आहे. यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांनी जोरदार टिका केली होती. त्यातच आता माजी खासदास संभाजी राजे यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा
अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्य सराकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल. असा इशारा संभाजी राजे यांनी दिला आहे.
अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते ? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 19, 2023
Read also
- हेही वाचा…“गद्दार माणूस काय करारा जवाब देऊ शकतो ?” एकनाथ शिंदेंच्या सभेवर दानवेंची तिखट प्रतिक्रिया
- हेही वाचा….“संजय गायकवाडांनी संपकरी कर्मचाऱ्यांची लायकी काढली”,राष्ट्रवादीने साधला निशाणा
- हेही वाचा…“मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली”, आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत
- हेही वाचा….इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक
- हेही वाचा….उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा