राज्यभरात सगळीकडे कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व निवडणूका पुढे ढकलण्यात येणार असलयाचे सांगितले होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत आदेश काढावेत, अशी मागणी केली आहे.
तसेच प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला राज्यपालांना प्रस्ताव पाठवून प्रशासक नेमण्याचा अध्यादेश काढण्याचा अधिकार नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला. याबाबतचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “राज्यात अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपत आला आहे. काहींचा कार्यकाल संपलेला आहे. अशा ग्रामपंचायतीवर राज्य सरकारने प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याबाबतचा अध्यादेश राज्यपालांनी काढला. मुळात असा अध्यादेश शासनाच्या सांगण्यावरुन राज्यपालांना काढता येत नाही. शिवाय असा अध्यादेश राज्यपालांना काढता येतो का? हा ही एक मोठा प्रश्न आहे.”
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “प्रशासन काहीही कारण सांगून निवडणुका पुढे ढकलत आहे. त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट सांगावे, युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती निवडणुका घेतल्याच पाहिजे. निवडून आलेल्या लोकांना पाच वर्षांची मुदत असते. त्यानंतर त्यावर प्रशासक नेमता येत नाही. त्यामुळे निवडणुका झाल्याच पाहिजे असा निर्णय न्यायालयाने ठामपणे द्यावा.” याबाबत आंबेडकरांनी न्यायालयाला विनंती केली आहे,