मुंबई : देशात सध्या सुरु असणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता १० मार्च रोजी लागणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर या राज्यनमध्ये नुकत्याच निवडणूका पार पडल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या शिवसेनेने गोव्यात, उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान म्हणून आपले उमेदवार उभे केले होते.
विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार
पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्सिट पोल पाहता आता भाजपची एक दोन राज्यांमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, नुकतंच महाराष्ट्रात फोन टॅपिंगचं एक प्रकरण समोर आलं आहे. माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे नाव यामध्ये समोर आले आहे. आता गोव्याच्या निवडणूक नुकत्याच संपल्या आहेत. गोव्यातही असाच फोन टॅपिंगचा प्रकार समोर आला आहे. गोव्यातील प्रमुख नेते सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, दिगंबर कामत, गिरीश चोडणकर यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय यंत्रणांच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय यंत्रणा यांचा सावळा गोंधळ समोर येत आहे. ज्या ज्या राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार नाही, त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल अशा ठिकाणी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून सत्ता आणण्याचे प्रकार सध्या सुरु आहे. गोव्यातील रश्मी शुक्ला कोण ? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळेच सत्ता खेचून आणण्यासाठी महारष्ट्रासारखा फोन टॅपिंगचा प्रकार सध्या सुरु आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी ते यशस्वी होऊ शकत नाही. देशात अभिव्यक्ती स्वात्रंत्य्वर गदा येत आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Read also:
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
- आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
- मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन