प्रतिनिधी/ ओंकार गोरे
पिंपरी चिंचवड : ५६ आमदाराच्या जिवावर आमचा राज्यात मुख्यमंत्री होवू शकतो तर ४०-४५ नगरसेवकांच्या जीवावर पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर का होवू शकत नाही, अशी गर्जना करत “आले तर सोबत अन्यथा स्वतंत्र लढू”, असा रोखठोक पवित्रा शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतला. त्यातच दुसरीकडे त्रीस्तरीय प्रभाग रचनेवरून काँग्रेसला डच्चू देत फोडफोडीच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा आपला बालेकिल्ला हस्तगत करण्याच्या मार्गावर उतरले आहेत. तर त्रीस्तरीय प्रभाग रचना असो की चार असो २०२२ मध्येही सोन्याच अंड देणारी कोंबडी आपल्याच मुठ्ठीत राहणार असल्याचे सांगत आगामी निवडणुकीसाठी भाजपचे स्थानिक आमदार दोन्ही पाय घट्ट मैदानात रोवून उभी राहिली आहे. त्यामुळे, २०२२ मध्ये होणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेचा खरा बाजीगर कोण ठरणार? अन् त्रीस्तरीय प्रभागातून कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारची ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; भाजपाने मात्र दावा फेटाळला
सलग १५ वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. परंतू, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला तडे गेले. २०१४ नंतर देशासह राज्यात भाजपचे सरकार असल्याने महापालिका निडवणुकीत भाजपने चार सदस्यीय प्रभाग रचनेची आखणी केली. देशातील मोदी लाट, शहरातील प्रभाग रचना आणि बालेकिल्ल्यातील राष्ट्रवादीवर लागलेले भ्रष्टाराचे आरोप, यामुळे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता खेचून आणली. बालेकिल्ला नावाने चर्चीला राष्ट्रवादीचा अवघा बुरूंज ढासळल्या भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप २०१७ चे किंगमेकर ठरले. त्यामुळे, राष्ट्रवादी नेते अजित पवार अचानक तोंडघशी पडलेल्या अनेक दिवस शहरात फिरकले नाही, हे खरे असले तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने बालेकिल्ला पुन्हा हस्तगत करण्यासाठी दादांनी चंग बांधण्यास सुरूवात केली आहे.
सेल्फी विथ खड्डे… घेणाऱ्या सुप्रियाताई आता कुठे आहेत? मुंबईतील खड्यावरून विरोधक आक्रमक
आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने २०२२ मध्ये होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात एकूण ४३ प्रभाग असण्याची शक्यता आहे. त्यातील ४२ प्रभाग तीन नगरसेवकांचा, तर एक प्रभाग दोन नगरसेवकांची असण्याची शक्यता आहे. एकूण २३ प्रभागात दोन नगरसेविका व एक पुरूष नगरसेवक असणार आहे. तसेच महापालिकेच्या सभागृहात १२८ नगरसेवकांपैकी ६२ नगरसेवक, तर ६६ नगरसेविका असणार आहेत. त्यामुळे शहरात नगरसेवकांपेक्षा नगरसेविकांची संख्या जास्त असणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे. परंतू, पिंपरी महापालिका म्हणजे जणूकाही सोन्याच अंड देणारी कोंबडीच आहे की कायं? असा भास राजकारण्यांना होतो. त्यामुळे राज्यातील सत्तेपेक्षा राजकारण्यांना महापालिकेतील सत्ता महत्वाची वाटू लागली आहे. त्यातच २०१७ भाजपचे आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप किंगमेकर ठरल्याने नेतृत्वासाठी भाजप सज्ज असताना राष्ट्रवादीकडून नेतृत्वाचा झेंडा अद्याप हाती न घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण आहे.
राष्ट्रवादीतुन विलास लांडेचा पत्ता कट?
सन २०१९ विधानसभेच्या निवडणूकीत देशात मोदी लाट मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांना घरघर लागली. अनेक राजकीय पक्ष निवडणुकीबाबत चिंतेत होती. अशा अडचणीच्या काळात पक्षात निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा कस लागतो. विलास लांडे हे राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत तर आहेतच शिवाय पक्षाच्या जीवार नगरसेवक, महापौर व आमदार अशी महत्वाची पदे उपभोगली असताना २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या बरोबर राहणे आवश्यक होते. मात्र विलास लांडे यांनी तसे न करता २०१९ ची निवडणूक अपक्ष लढविली. त्यामुळे भोसरीचे विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष मोठ्या प्रमाणात बॅक फुटवर गेला असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उघड बोलू लागले आहेत. एका बाजूला लांडे यांनी भोसरी विधानसभेची राष्ट्रवादी उमेदवारी नाकारणे व दुसऱ्या बाजूला मोदी लाट त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची मोठी हानी झाल्याचे बोलले जात आहे.
लोचखोर प्रकरण भाजपला भोवणार?
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या लाचखोरीचे कोलीत राष्ट्रवादी काँग्रेसला आयतेच हातात मिळाले. स्वतः लांडगे आठवडाभर जेलमध्ये होते. आता स्थायी समितीच्या १४ सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाबजबाबासाठी बोलावले आणि रात्रभर चौकशी केली. २०१७ पासून भाजपा काळातील सर्व अध्यक्षांची चौकशी कऱणार असल्याच्याही बातम्या झळकल्या. गेले चार आठवडे हा खेळ सुरू आहे. स्थायी समितीत पैशाची पाकीटे मिळाल्याने त्यानुसार चौकशी सुरू आहे. त्यामुळे, आगामी निवडणुकीत भाजपला लाचखोर प्रकरणाचा मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.
`भ्रष्टाचार` हा मुद्दाच बाद
सुरूवातीला राष्ट्रवादीच्या काळात विठ्ठलाच्या मुर्तीचा भ्रष्टाचार भाजपने चांगलाच उचलुन धरला होता. त्यात आता नितिन लांडगेंनी केलेला पराक्रमाने भाजपच्या प्रतिमेला तडा गेला. परंतू, २०२२ च्या महापालिका निवडणूक प्रचारात आता `भ्रष्टाचार` हा मुद्दाच बाद आहे. कारण राष्ट्रवादी ३ टक्के तर भाजपा काळात ५ टक्के घेतले जातात. दोन्ही पक्ष हमाम मे नंगे आहेत. जास्तीत जास्त लहान चोर, मोठा चोर अशी तुलना होऊ शकते इतकेच. राज्यकर्त्यांच्या लाचखोरीला लोक वैतागलेत. अजित दादांनी अगोदरच जाहीर केले की, निवडूण येण्याची क्षमता असणारे उमेदवार असतील. त्याचाच दुसरा अर्थ स्वच्छ चारित्र, अभ्यासू वृत्ती, दांडगा लोकसंपर्क, कर्तृत्व, निष्ठा याहीपेक्षा पैसा, गुंडागर्दी, दहशत असेल त्यांना प्राधान्य असणार आहे. आजच्या गलिच्छ राजकारणात असेच उमेदवार निवडूण येतात. दादांना हे काळे चित्र बदलायचे नाहीय, तर काही करून फक्त सत्ता पाहिजे आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या शहराचा कडेलोट करायचा की, बारामती सारखा स्वर्गसुखाचा आनंद पिंपरी चिंचवडकरांना द्यायचा, ते दादा तुम्हीच ठरवा.
Read Also :
- सत्तेचा अमर पट्टा घेऊन जन्माला आलेलं हे सरकार नाही; काही दिवसात आमचं सरकार निश्चित येणार – फडणवीस
- शिवसेना खासदार भावना गवळींना वर्षावर नो एन्ट्री; अर्धा तास थांबूनही उद्धव ठाकरेंची भेट नाही
- वाशिम जिल्ह्यात महाविकास आघाडीत पडली फूट; मतदारसंघामध्ये तिरंगी-चौरंगी लढत रंगणार
- ‘त्या’ कार्यक्रमाचे विखे पाटलांकडून निमंत्रण नाही, तरीही शरद पवार अन् नितीन गडकरी एकाच मंचावर
- महापालिका निवढणुकीसाठी तीन प्रभाग रचना अंतिम, कोणाला फायदा होते ते पाहू – अजित पवार