मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यातील लॉकडाऊन उठवण्याच्या मुद्दावरुन वेगवेगळी मत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. जर आरोग्य मंत्री राजेश टोपे हे शाळांच्या परीक्षा होणार की नाही, याबद्दल बोलत असतील तर मी माझ्या खात्याबद्दल माहिती दिली तर त्यात काय चुकीचे? असा सवाल मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून निर्बंध शिथिल करण्यासाठी बैठक झाली होती. याची संपूर्ण कल्पना ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी याबद्दलची सूचना अधिकाऱ्यांना सुद्धा दिली होती. त्यानुसारच अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाच्या बैठकीत चर्चेला आला. या बैठकीला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, मुख्य सचिव हजर होते.
दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वडेट्टीवार यांच्याकडे या प्रकरणाबद्दल विचारणा केली. त्यावेळी वडेट्टीवार यांनी आपली बाजू मांडत नाराजी व्यक्त केली होती. राजेश टोपे हे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत. पण ते अनेक विषयांबद्दल बोलतात. त्यांना कुणीही काही बोलत नाही. मग मी बोलल्यानंतर एवढा गोंधळ कशाला? असं सांगत वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली.
Read Also :
- ‘नारायण राणे हे स्वत:च्या स्वार्थसाठी पक्ष बदलतात; तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही’
- ‘काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले’
- ‘मोदींची हिटलरशी तुलना योग्य नाही, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता’
- ‘पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?’
- ‘अनलॉक’च्या निर्णयाबाबत गोंधळ का झाला?, मुख्ममंत्री म्हणाले…