मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून सरकार बनले आहे खरे. मात्र हे तीनही पक्ष आपापसात भांडताना दिसून येत आहे. तीनही पक्षाची आपापसात धुसफूस चालू आहे. तीन पक्षांनी खुशाल एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या कराव्यात, परंतू, जनतेला वेठीस का धरताय?, असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. ते आज (मंगळवारी) मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला आमचा पाठिंबा; शिवसेना राष्ट्रावादी काँग्रेसने केला पुनरुच्चार
यावेळी शेलार बोलतांना म्हणाले, तीन पक्ष एकत्र येवून काय कुरघोडी करतायं, याच रोज सार्वजनिक प्रदर्शन पहायला मिळत आहे. तीन पक्ष एकमेकांवर काहीही कुरघोड्या करू द्या, आम्हाला त्या बद्दल काही एक देणघेण नाही. परंतू जनतेच्या इच्छा, आकांशा, बीमोड करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आज रोजगा बुडतोयं, रोजगारावार, कामाला जाणाऱ्या व्यवसायिकाला कामावर जाताना अडवल जातयं, यातून जी कुचंबना सामान्य माणसाला स्वत:च घर चालण्यासाठी करायची आहे. त्यातून तो कुठतरी सुटका करू पाहतो आहे. आणि रोज यांच्या कुरघोड्या चालू आहेत, अशी घणाघाती टीका देखिल त्यांनी केली आहे.
तीन पक्षांनी खुशाल एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या कराव्यात जनतेला वेठीस का धरताय? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/KhmZMRNn49
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 29, 2021
ते पुढे बोलताना म्हणाले, तीन पक्ष आपापसात भांडतायं का?, तर हो आपापसात भांडत आहेत. तीन पक्ष आपसात भांडतायं का? तर हो तेही चित्र आहे. त्यामुळे सुनियोजित अशा पद्धतीचे राज्या चालले नाही तर ते हे जनतेला वेदना देणार आहे. जनतेला त्रास देणार आहे. या प्रकारच्या जनतेला वेदना जनता कधीही मान्य करणार नाही, असेही शेलार यांनी सांगितले.
Read Also :
- मोठी बातमी! अखेर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार शुल्क कपातीचा दिलासा!
- “अनिल देशमुखांना होणार अटक? ईडीला मिळाले सर्व पुरावे” याचिकाकर्त्या वकिलाने केला दावा
- आंदोलकांनी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा अडवला
- “मंत्री तुडुंब गर्दी जमवतात, मुख्यमंत्री मात्र जनतेला धडे देतात”
- मनसेचा मोठा नेता सायबर क्राईमचा बळी, केले सतर्क राहण्याचे आवाहन