नवी दिल्ली : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या खंडणीच्या आरोपांमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना या प्रकरणी पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आता अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत आणि देशमुखांची चौकशी सुरु आहे.
जळत्या हेलिकॉप्टरमधून 3 जणांनी उड्या मारल्या; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम…
दुसऱ्या बाजूला माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांना कोर्टाच्या चक्करा माराव्या लागत आहेत. त्यांच्याकडे असणारे होमगार्ड महासंचालक पद हे नुकतेच काढून घेण्यात आले आहे. मात्र अद्यापही परमबीरसिंग यांना अटक करण्यात आलेली नाही. यामागचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा अखेर मृत्यू
याच घटनेचा धागा पकडून संसदेत शिवसेनेने सरकारी पक्षावर जोरदार हल्लबोल केला आहे. खंडणीचे अनेक गुन्हे दाखल असलेले आरोप करुन पळून गेलेल्या परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्ट म्हणजेच न्यायपालिका वारंवार अटकेपासून संरक्षण का देत आहे? असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. अरविंद सावंत यांनी न्यायाधीशांच्या पेन्शन विधेयकावरील चर्चेत सर्वोच्च न्यायालयावर आणि एकूणच न्यायव्यवस्थेवर थेट शब्दात टीका केली आहे. परमबीर यांनी आरोप केले आणि ते पळून गेले. या पळून गेलेल्या गुन्हेगाराला सुप्रीम कोर्ट अटकेपासून वारंवार संरक्षण का देत आहे, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.
मनसे-भाजप एकत्र येणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं मोठं विधान
राज्यात मागील दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. महाविकास आघाडी सरकार जेव्हापासून आले आहे तेव्हापासून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेवरही त्यांनी थेट बोट ठेवले. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करुन अनेकांना तुरुंगात डांबले जाते आहे. ते निर्दोष असल्याने कोर्ट त्यांना मुक्त करत आहे. पण ज्या यंत्रणांनी त्या लोकांना अटक केली त्या यंत्रणांवर काहीही कारवाई का होत नाही, असा परखड सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.
Read Also :
- पिंपरी-चिंचवडचा अभिमान ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे काम प्रगतीपथावर; आमदार महेश लांडगेंकडून कामाची पाहणी
- तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटना: १४ पैकी १३ प्रवाशांचा मृत्यू, मृतदेहांची डीएनए चाचणी होणार
- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांमध्ये खडाजंगी; शिवसेनेतील अतर्गत वाद चव्हाट्यावर
- उपमहापौर व भाजप नगरसेवक राजेश काळे यांना दोन जिल्ह्यातून केले तडीपार
- सायबेरियन पक्ष्यांप्रमाणे काही ‘पक्षी’ कोलकात्याहून येतात, काही दिल्लीहून येतात…