दिल्ली : महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर असं नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजुर केला. पण यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने त्या प्रस्तावाला स्थिगिती दिली आणि नंतर औरंगाबाद शहराला ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादला ‘धाराशिव’ असे नामांतर देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या निर्णयानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शहरात आंदोलने करण्यास सुरूवात केली. याला आता भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
“मोठ्या व्यक्तींवर पातळी सोडून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”
एमआयएमला माझा एकच सवाल आहे. तुमचे औरंगजेबाबद्दल एवढं प्रेम का आहे? ज्यांनं मराठवाड्यावर अन्याय केला, येथील लोकांना त्रास दिला, त्या औरंगजेबाबद्दल तुम्हाला इतका पुळका येण्याचं कारण काय? सारा महारष्ट्र जाणतो, औरंगजेब काय होता? दिल्लीपासुन गल्लीपर्यंत सगळेजण जाणतात. औरंगजेब एवढं चांगलं असेल, तर तुम्ही आपल्या मुलाचं नाव औरंगजेब का ठेवत नाहीत, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
“काँग्रेसचा विरोध हा ईडी आणि महागाईला नसुन श्रीराम मंदिराला आहे”
संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजातील एकाही मुलाचं नाव औरंगजेब नाही, असं मला स्वत:ला माहीत आहे. आधी आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवायला सुरूवात करा, मग आमच्या गावाला औरंगाबाद म्हणा, असा टोला रावसाहेब दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर लगावला आहे.
नाशिक, औरंगाबाद आता जालना ; खोतकरांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जालना भेटीचे निमंत्रण
औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमचा एवढा विरोध का आहे. इम्तियाज जलील यांच्याकडून औरंगाबाद शहरात आंदोलन आणि मोर्चा काढून नामकरण करण्याला विरोध का केला जात आहे? असा सवालही उपस्थित होत आहे. तर राज्यात पुन्हा एकदा औरंगाबाद नामांतरावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
Read also
- “एकनाथ शिंदे मंत्री असताना सगळ्या फाईल्स तुमच्याकडे असायच्या, आम्हाला शिकवू नका”
- “चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला का?”; संजय शिरसाठ यांचा हल्लाबोल
- “राज्यात सत्तेत बसलेले सरकार किती काळ राहिल सांगता येत नाही”
- “हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ”; नितेश राणेंचा कडक इशारा
- “अडीच वर्षात महाराष्ट्राला बुडवण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलंय”