पुणे : महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिक पाण्यात वाहून गेले आहेत. हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेले आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तर मात्र केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांना मदत करताना दुजाभाव करण्यात आला आहे. राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असताना केंद्रानेही समान मदत करावी असे म्हणत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या परिस्थितीत राजकारण करत असलेल्या विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. नुकसानबाबत संपूर्ण माहिती आल्याशिवाय निर्णय घेणार नाही. वेगवेगळे पालकमंत्री दौऱ्यावर आहेत, मी आणि मुख्यमंत्री जिल्ह्यात बसून निर्णय घेऊ, असेही पवार म्हणाले.
धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार – उद्धव ठाकरे
बंगाल उपसागरात गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीवरून मोदी सरकारवर पवारांनी टिकास्त्र साधले आहे. पावसामुळे पूरपरिस्थितीमुळे राज्यात नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी वेगवेगळ्या पक्षांकडून मागणी केली जातेय असे अजित पवार म्हणाले. तर महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. असही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
पुरात आतापर्यंत तब्बल 436 जणांचा मृत्यू; 22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त, मुख्यमंत्री पाहणी करणार
पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. पालकमंत्री त्या त्या भागात दौऱ्यावर आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करायचं काम सुरुय. केंद्र सरकारनं दुजाभाव करु नये. आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे. असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच सगळी माहिती आल्याशिवाय तसा निर्णय घेता येत नाही. तसेच पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण होणं महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
मग कोल्हापूर सांगली रायगड इथे पूर आला त्याला काय कारण आहे? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. आज तिथल्या माणसांना आधार देणे महत्वाचे आहे. तलावातला गाळ काढला तो वरच्या बाजूला टाकायचो नसतो. शेतकरी अनेकदा तो गाळ वापरतात. काही भागात प्रचंड पाऊस पडला. पाणी आता ओसरेल आहे पूर्वपदावर येत आहे. शेतीचे नुकसान झाले. सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाले आहे.
Read Also :
- ठरलं: ४ तारखेपासून शाळा सुरू होणार; परंतू, एका बेंचवर एकच विद्यार्थी असणार, वाचा नियमावली…
- काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेवर सोलापूरात गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण, वाचा सविस्तर…
- शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं, अंत पाहू नका, पंचनामे नकोत, तात्काळ मदत द्या – राणा जगजितसिंह
- शेतातील पिके पाण्याखाली, शेतकरी वाऱ्यावर, पालकमंत्री मात्र पुणे दौऱ्यावर – पंकजा मुंडे
- न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना जनताच धडा शिकवेल – अमित ठाकरे