पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक भेटीनंतर, सातत्याने या दोन्ही पक्षाच्या युतीसंदर्भात वावड्या उठत आहेत. दरम्यान, दोन्ही पक्षांकडून अजून तरी, ही युती होणारच! अशा प्रकारचे कोणतेही सूचक वक्तव्य केले गेले नसले, तरी कोणाकडून ही शक्यता नाकारलीही गेली नाहीये. त्यामुळे या बातम्या हवा आहेत की आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, धक्कातंत्राचा उपयोग करून ही युती होऊ शकते, याबाबत साशंकता आहे.
“MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा”, मागणी घेऊन ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपाल दरबारी
दरम्यान, आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “मी राज ठाकरेंनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी संपूर्ण ऐकली, अंतर अजूनही माझ्या मनात काही मुद्दे आहेत, आता त्याबद्दल मी त्यांच्याशीच चर्चा करणार आहे. मनसे बरोबर युती करताना आम्हाला, केवळ पुणे किंवा एखाद्याच भागाचा विचार करून चालणार नाही. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे. त्यामुळे एकीकडे युती करून फायदा आणि दुसरीकडे, असं होऊन चालणार नाही”, असं सांगितलं.
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी या दोन नेत्यांमध्ये या उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी, मनसेचा परप्रांतीयांना असणारा विरोध सोडला तर आमच्यात साधर्म्य आहे. मात्र हा निर्णय माझा नाही, युती करायची असल्यास मला केंद्राशी बोलावं लागेल. पक्ष कार्यकर्ते, सहकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. त्यांनतर राज यांनी मी ‘त्या’ क्लिप्स पाठेवन, त्या एक असं पाटलांना सांगितलं. यानंतर मनसेकडून त्यांना भाषणाच्या सीडी पाठवल्या गेल्या.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या रहस्याचा अखेर उलगडा करण्यात NIA ला यश
मात्र, राज यांनी आपण कोणत्याही क्लिप्स त्यांना पाठवल्या नसल्याचं सांगत, युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. “माझ्या स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, आज पुन्हा एकदा पाटलांनी भाजप-मनसे युतीबाबत भाष्य केलं आहे. तसेच, राज यांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता पुन्हा एकदा बळावली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Read Also :
- पूरग्रस्तांना दिलेले चेक ‘या’ कारणामुळे घेतले परत, अनिल परब म्हणतात…
- झिकाचे संक्रमण नाही, घाबरून जाऊन नका! आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
- “आरक्षण गेलं हे पाप भाजपचं”, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे-वडेट्टीवार आमनेसामने
- चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? परमबीर सिंग यांनी हायकोर्टात दाखल केली याचिका
- पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक