मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. याला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले ११४ उमेदवार उपस्थित होते. दरम्यान, या बैठकींनंतर नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत कुणाशीही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही, स्थानिक परिस्थिती पाहूनच निर्णय घेतले जातील, असं स्पष्ट केलं.
शिवसेना-काँग्रेसच्या मंत्र्यांवर राष्ट्रवादी नाराज? मलिकांनी स्पष्ट केले कारण
“आजच्या बैठकीत एकूण ५५ लोकांनी आपली मते मांडली. त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती, त्यांचे प्रश्न या गोष्टी त्यांनी बैठकीत मांडल्या. तसेच सरकारकडून त्यांना असलेल्या अपेक्षाही व्यक्त केल्या.यावेळी, काही उमेदवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावर बोलताना, तीन पक्षाचं सरकार असल्याने, प्रत्येक पक्ष कधी कधी आपल्याच आमदाराला झुकतं माप देतो. त्यामुळे, आजच्या तक्रारींचे समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल,” असं सांगितलं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडत आहे.@PawarSpeaks #NCP #meeting pic.twitter.com/RGltqwAaOk
— NCP (@NCPspeaks) September 8, 2021
बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको – विनायक राऊत
दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीत पक्षान ११४ उमेदवारांना तिकीट दिलं होतं आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला ११४ जागा आल्या होत्या. त्यामुळे, पक्षाकडून या ११४ मतदारसंघावरच अधिक भर द्यायला सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. त्याचसाठी या ११४ मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आज पवारांनी जाणून घेतली. त्यामुळे, आता राष्ट्रवादीच्या ‘मिशन ११४’ ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
बेळगावात मराठी माणसाचा नाही, संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला – देवेंद्र फडणवीस
तसेच, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आधी राज्यव्यापी ‘राष्ट्रवादी परिवार यात्रा’ काढून महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यांनतर पक्षाच्या मोर्चेबांधणीला जोर आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ३ वर्षानंतर विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक होणार आहे. तसेच येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली असल्याचे यता सततच्या बैठकांतून दिसून येत आहे.
Read Also :
- दाऊदला पाठवले तरी भीत नाही, मी घोटाळे उघडकीस आणणार – किरीट सोमय्यांनी ललकारले
- चिपी विमानतळ उद्घाटन, राणे म्हणाले मुख्यमंत्र्यांची गरज काय? भाजप नेते म्हणतात…
- माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत – किरीट सोमय्या
- चिपी विमानतळ श्रेयवादावरून राजकारण तापलं, पुन्हा पाहायला मिळणार राणे-मुख्यमंत्री संघर्ष?
- विजय वडेट्टीवारांनी मंत्री पदाचा राजीनामा देवून हातभट्टी विकायचा धंदा टाकावा – भाजप