महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर या संकटाच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर कुणीही त्यांचा वाढदिवस साजरा करू नये, कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचं काटेकोर पालन करुन, राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
22 जुलैला अजित पवार यांचा वाढदिवस आहे. कार्यकर्त्यांनी कोणतेही कार्यक्रम, भेटीगाठी न करता, त्याऐवजी कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांची मदत करावी, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील समस्त हितचिंतकाच्या शुभेच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत. या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. परंतु प्रत्यक्ष भेटीसाठी न येता डिजिटल माध्यमातून शुभेच्छा पाठवाव्यात,’ असे अजित पवारांनी सांगितले आहे.