अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याची तयारी वेगात सुरू आहे. सध्या कोणा कोणाला निमंत्रण दिले जाणार यावरून चर्चा रंगत आहे या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आपली भूमिका मंडळी आहे.
भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले तरी मी अयोध्येला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे.
शरद पवार म्हणाले,”‘राम मंदिराबाबत आता कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व वाद मिटले आहेत. सध्या कोरोनाची गंभीर स्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यातच राहणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.