मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची बाब नाशिकमधील स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपमधील नव्या धुमश्चक्रीचे कारण ठरले. दोन्ही गटांकडून दगडांचा वर्षाव झाला. या घटनाक्रमाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सेना, भाजपच्या कार्यालयात मात्र नेहमीप्रमाणे शांततेचे वातावरण होते. कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली. निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते उफाळलेल्या संघर्षावर मंथन करीत पुढील रणनीती आखत होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. असं असतानाच बुधवारी भाजपाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच सामनाच्या संपादिका आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष वरुण देसाईंविरोधात वेगवेगळ्या कारणांसाठी तक्रारी दाखल करण्यात आल्यात. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.
फेसबुक लाइव्ह केलं…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी राणेंनी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून राणे यांच्याविरुध्द जातीय तेढ निर्माण करणे, द्वेष निर्माण करणे अशा विविध कलमांन्वये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच साबर पोलीस स्थानकामध्ये आता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि वरुन देसाईंविरोधात तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलाय. भाजपाच्या वतीने तीन जणांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत. पाहिली तक्रार ऋषिकेश अहेर यांनी मुख्यमंत्री आणि वरुण देसाईंविरोधात दाखल केलीय. देसाई यांनी मुंबईमधील राणेंच्या घऱाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचं फेसबुकवरुन लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने आयपीसी कलम १५३ (अ), १०७ आणि २१२ सहीत सायबर गुन्ह्यांखाली तक्रार दाखल करुन घेण्यात यावी असं म्हटलं आहे.
यवतमाळमध्ये तक्रार दाखल
अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांविरोधात केलेल्या वक्त्याव्याप्रकरणी भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून यवतमाळ जिल्ह्यात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. उमरखेड, यवतमाळ, महागाव, पुसदसहित एकूण पाच ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचे भुतडा यांनी ‘प्रसार माध्यमांशी’ बोलताना सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…
‘योगी आदित्यनाथ यांना चपलांनी मारलं पाहिजे. ते योगी आहेत त्यांनी कुठंतरी जाऊन बसावं. त्यांनी कशाला मुख्यमंत्री होऊन राजकारण करावं’, असं मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये म्हटल्याचा व्हिडीओ आपण पाहिला आणि त्यानंतर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तसेच जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील इतर भाजपा कार्यकर्त्यांनाही मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यास सांगितले आहे, असे भुतडा म्हणाले. राणे जे बोलले त्यापेक्षा उग्र स्वरूपाची ठाकरे यांची भाषा होती. ज्या कलमांतर्गत राणेंविरोधात तक्रारी दाखल केल्या त्याच कलमांतर्गत मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.
Read Also :
- अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, अनिल परबांच्या व्हिडीओची घेतली दखल
- “भोकं पडलेल्या फुग्याला संजय राऊत एवढे का घाबरतात?” – गोपीचंद पडळकर
- भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई
- एक सदस्य प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश जारी, महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल
- काँग्रेस – राष्ट्रवादीची काय औकात, भांडण लावून सत्तेत आले – चंद्रकांत पाटील