मुंबई: राष्ट्र्वादी काँग्रेसने जर मुख्यमंत्रीपदाची मागणी केली तर काँग्रेस सुद्धा आपली योग्य भुमिका घेईल असा इशाराच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. महाविकास आघाडीत बिघाड असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पडद्याआड सुरु असलेली चर्चा आता समोर येत आहे. उद्धव ठाकरे हेच आता पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील असे यावेळी नाना पटोले म्हणाले.
मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच पाच वर्ष राहणार आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापननेच्या प्रकियेतील मी एक महत्वाचा घटक होतो, साक्षीदार होतो. पूर्णकाळ राज्याचे मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडेच राहील, अशी कमिटमेंट सुरुवातीपासूनच केलेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जाहीरपणे हेच सांगितले आहे. असे खासदार संजय राऊत म्हणाले होते. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थनं केलं आहे.
काँग्रेस पुढील स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वबळ लढवणार ही आमची भूमिका आहे. कार्यकर्त्यांचीही तशी इच्छा आहे. तसंच, २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस हा मोठा पक्ष ठरणार आहे. जनतेनं आम्हाला जास्त जागा दिल्या तर आमचे पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतली कुणाला मुख्यमंत्री करायचे.आता तरी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हेच पाच वर्ष मुख्यमंत्री असणार आहे, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट करत आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर फटका काँग्रेस बसेल
पंढपूर विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने काय झाले, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसला काही फरक पडणार नाही’ असंही पटोले म्हणाले.