औरंगाबाद : नुकताच राज्य मंत्रिमंडळात एक महत्वपूर्ण ठराव मंजूर करून घेण्यात आला आहे.मुंबईसह राज्यातील इतर शहरांमधील दुकानांच्या पाट्या आता इथून पुढं मराठीत आणि मोठ्या मोठ्या अक्षरात असायला हव्या असा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे.
मराठी पाट्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गर्भित इशारा
या निर्णयाला विरोध करणाऱ्या अमराठी व्यावसायिकांना संजय राऊत यांनी दम भरला होता. कोणत्याही व्यावसायिकांनी म्हणू नये की आम्ही याबद्दल विरोध करतोय. तुम्हाला जर महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर तुम्हाला या निर्णयाची अंबलबजावणी करावीच लागेल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. यानंतर एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकार, तुम्ही काय लोकांना मूर्ख समजत आहात का? निवडणुका आल्या की तुम्हाला मराठी अस्मिता, मराठी पाट्या असे विषय कसे सुचतात? असा संतप्त सवालही जलील यांनी केला आहे.
भाजप नेते नितेश राणे यांना न्यायालयाचे अभय? आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं…
जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येतात तेव्हा तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलत असता. जनतेला काय तुम्ही मूर्ख समजता का ? की त्यांना तुमची ही नौटंकी लक्षात येणार नाही. मराठी पाट्या लावून काय तुम्ही मराठी तरुणांना रोजगार देणार आहेत का ? हा मिलियन डॉलरचा प्रश्न आहे असं देखील जलील यांनी म्हटलं आहे. या शिवाय तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि योजनांना मदत देण्याचा निर्णय घेऊ शकते का? किंवा अल्पसंख्याक आणि विशेषत: मुस्लिमांना त्या बदल्यात काहीही न मिळता फक्त मते द्यायची आहेत, असा चिमटा देखील इम्तियाज जलील यांनी सरकरला काढला आहे.
Read also:
- लवकरच राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दिसतील; माजी आमदार विजय गव्हाणेंचा गौफ्यस्पोट
- गेली १८ दिवसांपासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे अखेर माध्यमांसमोर प्रकटले
- मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा नेता; भाजप नेते प्रविण दरेकरांच वर्चस्व संपुष्टात?
- महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर पाट्या मराठीतच कराव्या लागतील; राऊतांचा सज्जड दम
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी; राणेंच्या उमेदवारानेच मारली बाजी