मुंबई – महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या १५ दिवसांपासून संप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण करा अथवा संप मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी आणि संघटनांनी घेतली आहे. काल आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, एसटीचे कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सरकारसोबत बैठक घेतली होती.
मात्र अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा सुटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीची घोषणा केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांप्रमाणे पगारवाढ मिळणार आह. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना नियमितपणे चांगले काम केल्यास इन्सेन्टिव्ह देखील देण्यात येईल असं देखील सरकरकडून सांगण्यात आलं आहे.
आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं- सदाभाऊ खोत
कर्मचाऱ्यांनी मात्र आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतरिक्रिया दिली आहे. तसंच कामगारांचे नेते बनलेल्यांना आता एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार करायचा आहे का ? असं म्हणत राऊतांनी सवाल उपस्थित केला आहे.
एकीकडे कामगारांना चांगलं पॅकेज मिळावं म्हणून सरकारकडून चांगल्या प्रकारची घोषणा करण्यात आली आहे. परिवहनमंत्र्यांनी आकडे सर्वांसमोर वाढले आहेत. राज्य सरकार याची तरतूद करणार आहे. कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे राजकीय पक्ष जर असाच संप चिघळत ठेवणार असतील तर ते हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान करतायत हे त्यांनी लक्षात घ्यावं.
ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; नाना पटोले घेणार मंत्रिपदाची शपथ?
त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का असा सवाल राऊतांनी विचारला. असं करू नका असंही राऊत म्हणाले. राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळे लोक कामगारांबाबत संवेदनशील आहोत.
महाराष्ट्र, मुंबई ही कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळाले आहेत. कष्टकऱ्यांचं नुकसान व्हावं असं राज्य सरकार कधीच करणार नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पगारवाढ देत असल्याचंही राऊतांनी यावेळी सांगितलं आहे.
Read Also :
- खोत-पडळकरांनी आंदोलन सोडलं, पण आंदोलक एसटीची घंटी वाजू देणार नाही..
- फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर आले समोर; मुंबईत दाखल झाल्याची माहिती
- नवाब मलिक यांनी झईदा वानखेडे यांचा मृत्यूचा दाखला ट्विट करत पुन्हा माजवली खळबळ
- मोठी बातमी: आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, सताभाऊ खोत यांची घोषणा
- ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम: २१ डिसेंबर रोजी होणार मतदान