नागपूर : मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातल्या निर्बंधांवर मोठं भाष्य केलं असून, आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रातच लागतील,” असं ते म्हणाले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषदेत हे विधान केलं. तसेच, नागपूर मध्ये लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना, “नागपूरसह महाराष्ट्रात पुढील काही दिवसांसाठी तरी कडक निर्बंध लावण्याची शक्यता नाही. मात्र, तिसरी लाट येणार हे अटळ आहे,” असं त्यांनी सांगितलं.
राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार? अखेर मुहूर्त ठरला! उदय सामंत यांची मोठी घोषणा
“सध्या संभाव्य तिसरी लाट राज्याच्या उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे जनतेने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मात्र, निर्बंध वाढवायचे कि नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. परंतु सध्या राज्यात निर्बंध कडक करणार असल्याचे कोणतेही सुतोवाच नाही. नागपूरचे पालकमंत्री म्हणून राऊत यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असावी. मला त्याबाबत माहिती नाही. मी ती घेऊन सांगतो. पण निर्बंध लावायचे की नाही, ते कडक करायचे कि नाही, हे सर्वस्वी रुग्णसंख्येवर अवलंबून आहे,” असं ते म्हणाले.
‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
तसेच, “राज्यभरात पुन्हा बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे, खबरदारी साठी कोकणात जाताना RTPCR चाचणी अनिवार्य केलं आहे. पण राज्यात निर्बंध लावायचे झाल्यास चार स्तरांत लावले जातील. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या उपाययोजना राज्यभरात केल्या जात असून, सर्व जिल्हयात ऑक्सिजन प्लांट, स्टोअरेज टँक उभे केले आहेत. त्यामुळे, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही. टास्क फोर्सने तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढेल असं सांगितलं आहे. त्यामुळे त्याची खबरदारी घेत आहोत,” असंही त्यांनी सांगितलं.
मोहन भागवतांच्या ‘सर्व धर्म एकचं आहेत’ विधानावर शरद पवारांनी लगावला टोला
दुसरीकडे, महामारीमुळे दूर दृश्य प्रणालीद्वारे सुरु असणारी राज्यातील महाविद्यालये, आता महामारीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत असल्यामुळे, लवकरच सुरु होणार आहेत. काही महिन्यांपासून हळूहळू अनलॉकचा निर्णयही घेण्यात आल्यांनतर, आता उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येतं शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार असल्याची मोठी घोषणा केली आहे. महामारीचे सर्व नियम पाळूनच राज्यात महाविद्यालये सुरु केली जातील, असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- भावना गवळींच्या ट्रस्टशी संबंधित दोघांना ईडीचे समन्स; मागितली १५ दिवसांची वेळ
- चंद्रकांत पाटलांनी महापालिका निवडणुकीचा शड्डू ठोकला; एकाच वेळी एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद
- परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, भ्रष्टाचारप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी
- हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? – प्रसाद लाड
- “OBC आरक्षणाशिवाय निवडणूका होय नयेत! पण…”, शरद पवारांनी केलं मोठं विधान