जालना : आज शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी, राष्ट्रवादीवर केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी, “अधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीच्या प्रकरणावरून, “होय! मी त्यांच्या बदलीची शिफारस केली होती, पण त्यासाठी राष्ट्रवादीने एवढं रान पेटवलं. लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
तसेच, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरही जहरी टीका करत, “एका प्रकरणात आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली. कमिशनरपर्यंत तक्रारी केल्या. कमिशनरने आदेश दिले, दुकानदाराला दुकान बहाल करा आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. पण एवढं असतानाही भुजबळ साहेबांनी एक पत्र दिलं अन् याचं तात्पुरतं दुकान दुसऱ्याला जोडा, असं सांगितलं, जसं काय यांच्या बापाची जहागिरीच आहे”, असा एकेरी शब्दांत भुजबळांवर हल्ला चढवला.
यावेळी त्यांनी, “युती होणार नाही. ना विधानसभेत ना स्थानिक पातळीवर. झाली तर लोकसभेला होईल. तीही त्यांची गरज म्हणून, हा माझा अंदाज आहे आणि व्यक्तिगत मत आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही. इथे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत नाही. आपली-भाजपची जागेवरून झाली नाही. मग ३ पक्षांची कशी होणार? कोणी कोणी काय घ्यायचं आणि काय द्यायचं?, असा सवाल करत”, आघाडी आणि युतीबाबत सूचक विधान केलं.
…अन्यथा, 20 ऑगस्टला “अशोक चव्हाणांच्या घरापुढे मूक मोर्चा काढणार”संभाजीराजेंची घोषणा
दरम्यान आजच्या घटनेमुळे राष्ट्रवादी-शिवसेनेच्या युतीच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आले होते. त्या चर्चांना खीळ बसली असून, आगामी निवडणूका शिवसेना देखील स्वबळावर लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडं, महाविकास आघाडीत सारं काही आलबेल असल्याच्या कल्पना नेत्यांकडून रंगवल्या जात होत्या. त्यांना सुरुंग लावण्याचे काम जाधवांच्या विधानाने केले आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी-शिवसेना पक्षांमध्ये किती दरी आहे, हे अखेर अधोरेखित झाले आहे.
Read Also :
- २०१४ पासून देशाला ग्रहण लागलं, लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात – नाना पटोले
- शिवसेना खासदार संजय जाधवांच्या १० मिनिटांच्या भाषणाने अधोरेखित केली राष्ट्रवादी-शिवसेनेतील दरी?
- नाशकाताही राष्ट्रवादी-शिवसेनेत ठिणगी; उड्डाणपुल उदघाटनाच्या कार्यक्रमावरुन भुजबळ, शिवसेना खासदारावर नाराज
- संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
- “लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, शिवसेना नेत्याचे खळबळजनक विधान