पुणे : राज्यात अनेक मुद्द्यांवरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरु आहे. मात्र, सध्या सत्ताधाऱ्यांमध्येच मुख्यमंत्री पदावरुन वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटलो यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेचं ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं म्हटलं. मात्र, तरीही त्यांच्या इच्छेने राजकीय वर्तृळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. याच विषयावरुन पुण्यात एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदी राहतील का राष्ट्रवादी पण दावा करणार? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे जिल्हा परिषदेला आज (सोमवारी) खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी सुळे यांनी प्रशांत किशोर व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बैठकीबाबा बोलताना मी प्रत्यक्ष त्या बैठकीला उपस्थित नव्हते. यामुळे त्याविषयी जास्त काही सांगू शकत नाही असे म्हणाल्या. तुम्हाला ही असंच वाटतं का ? उद्धव हेच ५ वर्ष मुख्यमंत्री पदी कायम राहतील का ? राष्ट्रवादी दावा क्लेम करणार ? या प्रश्नावर सुळे यांनी ५ वर्षे महाविकास आघाडी सरकार टिकणार हे पवार साहेबांनी सांगितले आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर एकदा पवार साहेब बोलले की आम्ही कुणी बोलत नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
कोरोनामुळे संपूर्ण देशात डिजिटल डिव्हाईड तयार झाला आहे. एकूणच शिक्षणाची आणि त्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी वाटते.सलग दुसऱ्या वर्षीही अजून प्रत्यक्ष शाळा सुरू नाहीत. मोदींनी लसीकरणावरून राज्यांवर टीका केल्याचा संदर्भ घेऊन त्या म्हणाल्या, लसीकरणावरून एकमेकावर टीका करायची ही वेळ नाही. लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हायला पाहिजे. अमेरिका ओपन अप झाली असे सांगतानाच १२ ते १८ वयोगटात पण लसीकरण सुरू झाल्याचे सांगितले. राजगडाचा सिंहगड होऊ देऊ नका या गिर्यारोहकांच्या म्हणण्यावर काय प्रस्ताव आहे आधी बघूया ,स्थानिक लोकांची काय मते आहेत ते बघून बोलेन असेही सुळे यांनी सांगितले.
Read Also :
- अजित पवारांच्या अज्ञात वासाचे केंद ‘अंबालिका’त भेट झाल्याचे वृत्त माजी मंत्री राम शिंदे यांनी फेटाळले
- मुख्यमंत्रिपद मागितले तर योग्य भूमिका घेणार; नाना पटोलेंचा स्पष्ट इशारा
- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे युद्धपातळीवर सुरु
- मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे; अजितदादांचा पटोलेंना टोमणा
- ‘केंद्राकडे बोट दाखवून आघाडी सरकार आपली भूमिका टाळू शकत नाही, राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी’- शाहू छत्रपती