मुंबई : महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून गाजत असते. ही एक परंपरा झाली आहे असं म्हणायला देखील हरकत नाहीये. यावर्षीचे अधिवेशन हे नागपूरला न होता ते होणार आहे मुंबईमध्ये. होय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या आजारामुळे डिस्चार्ज मिळणार आहे आणि त्यामुळेच मुंबईमध्ये अधिवेशन होणार आहे.
कर्जतमध्ये पुन्हा एकदा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये सामना!
गत अधिवेशनात भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला होता. ते अध्यक्ष असताना बराच सावळा गोंधळ अधिवेशनात पाहायला मिळाला होता. मागच्या अधिवेशनावेळी विरोधी पक्ष कमालीचा आक्रमक झाला होता. असं म्हणतात रागात केलेल्या कामामुळे किंवा कृत्यामुळे आपल्याला त्याचा पच्छाताप नंतर करावाच लागतो. असच काहीतरी विरोधी पक्षातील आमदारांसोबत झालं. त्यावेळी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्षातील आमदार हे तालिका अध्यक्षांच्या दालनात घुसले. सुरुवातीला घोषणाबाजी आणि गोंधळ सुरु झाला.
निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप
त्यानंतर मात्र काही वेळातच होत्याचे नव्हते झाले. थेट तालिका अध्यक्षांना शिवीगाळ झाली असा काही प्रकार समोर आले. भास्कर जाधवांनी हे सर्व अधिवेशनात मांडलं आणि थेट कायदेशीर कारवाई केली. असभ्य वर्तन केल्यामुळे विरोधी पक्षातील १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता तालिका अध्यक्ष म्हणून त्यांची पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला असून २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत अधिवेशन प्रस्तावित आहे. त्यानंतरच्या अधिवेशन कार्यक्रमासाठी २४ डिसेंबरला बैठक घेण्याचे ठरले आहे. त्यात अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की नाही त्यावर चर्चा होईल करण्यात येणार आहे.
Read Also :
- कोल्हापूर जिल्हा बँक बिनविरोधीच्या उंबरठ्यावर ? पाहिलं पाऊल पुढे टाकत आमदार आवाडेंनी घेतला पुढाकार
- सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नाईक प्रबळ दावेदार
- पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
- “आ देखें ज़रा किसमें कितना है दम”; नवाब मलिक यांचे प्रवीण दरेकरांना आव्हान