मुंबई : वरळी येथील केशवआळीत राहणाऱ्या पुरी कुटुंबावर सोमवारी मोठं संकट ओढवलं. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने कुटुंबातील 4 जण भाजले. यातील महिला विद्या पुरी यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यातील चार महिन्यांच्या मुलाचा सोमवारीच मृत्यू झाला. 24 तासानंतर वडिलांचा मृत्यू झाला. आता या दुर्घटनेतील पाच वर्षाच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ५ वर्षाचे अनाथ बाळ वाचविण्यासाठी प्रयत्नशील. बाळ वाचल्यास आम्ही दत्तक घेणार. पालकत्व आम्हीच स्विकारणार. बाळाची प्रकृती ठिक आहे. किशोरी पेडणेकर यांनी पुढे विरोधकांना उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की,’संवेदना बोंब मारून येणार नाहीत, तर त्या ह्रद्यातून याव्या लागतात’.
कोरोनाच्या नावाखाली बिळात बसलेल्या वाघानं आता तरी बाहेर यावं – सदाभाऊ खोत
तसेच दुर्घटना घडलेला परिसर हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील आहे. यामुळे आदित्य ठाकरेंवर टीका होत आहे. याला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ‘ब्लास्ट झाल्यावर सेनेचे कार्यकर्ते पोहचले होते. उपचाराकरता त्यांना तात्काळ रूग्णालयातही नेण्यात आले. मात्र थोडा संभ्रम निर्माण झाल्यामुळे त्यांना नायर रूग्णालयात नेण्यात आले. पुढे महापौर म्हणाल्या की, तो व्हिडिओ कुणीही पाहिला तरी राग येण्यासारखाच होता. ज्या कंपनीची गॅस टाकी होती, त्या कंपनीसोबतही बोलत आहोत.
Read Also :
- …तर आदित्य ठाकरेंनी पदाचा राजीनामा द्यावा; नितेश राणेंची मागणी
- अध्यक्षपद हुकल्यानंतर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप
- शिवसेना गोव्यात स्वबळावर तर उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत युती करणार?, संजय राऊतांनी केले स्पष्ट..
- श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय – प्रकाश आंबेडकर