राज्याच्या महिला विकास व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राजस्थानच्या सत्ता संघर्षांवरून त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच, राज्यात दिलदार मुख्यमंत्री आणि शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सराकर स्थिर असल्याचंही त्या म्हणाल्या
यावेळी बोलताना त्या म्हणल्य भाजपला घोडेबाजाराची सवय आहे. त्यांना पैशाचा उन्मात आहे. कर्नाटकात मी हे अनुभवलं आहे. हे सगळं राजकीय संस्कृतीच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री आहेत, शरद पवार आणि सोनिया गांधी आहेत, त्यामुळे राज्यात सत्ता स्थिर आहे”, असं महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. “आदरणीय देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातील आहेत. मात्र, त्यांना सत्ता नसलेलं सहन होत नाही”, अशी टीका महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर केली.
राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसू लागले आहे. भाजप आणि आघाडी सरकार यावरून एकेमेकांना निशाणा साधत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.