अमरावती : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी औरंगाबाद येथे केलेल्या वक्तव्यामुळे काही शिवसैनिकांनी इथं येऊन गोंधळ घातला. तसंच अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे हे कारस्थान असल्याचा गंभीर आरोप बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी येथे केला. या गोंधळाचा राजकीय फायदा व्हावा यासाठी पालकमंत्री यशाेमती ठाकूर यांनी राजकीय पोळी भाजून घेतल्याचा आराेप राणा यांनी केला. मुख्यमंत्री यांनी नैतीकतेच्या आधारे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं राजीनामा घ्यावा, अशी मागणीही राणा यांनी केली.
दिलासा नाहीच: अनिल देशमुख यांना २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
आमदार रवी राणा म्हणाले, चार ते पाच दिवसांपासून अमरावती येथे तणावाचे वातावरण आहे. संपुर्ण अमरावती शहरात मोठ्या संख्येने पोलिस तसेच एसआरपीएफ आहे. शिवसैनिकांनी येथे येऊन मोठ्या प्रमाणात शहरात गोंधळ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याला खासदार संजय राऊत हे जबाबदार आहेत.
शिवचरित्राचा महान उपासक गमावला, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली – चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु. तसेच ठाकूर यांच्या विरोधात आंदोलन छेडू असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे.
Read Also :
- “राज्यात दंगली भडकवण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात आघाडीचाच हात”
- वर्ध्यात भाजपला बसला मोठा धक्का; नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्षाने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना अटक
- एकत्र येण्याची इच्छा उरली नाही; भाजप- सेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
- बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, त्यांचे योगदान विसरून चालणार नाही