मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच मराठ्यांना माझे सांगणे आहे की यशवंतराव चव्हाण तत्वनिष्ठ नेते होते, ते शरद पवारांसारखे भागूबाई नव्हते. अशी जहरी टिका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केलीय. त्यावर आता शरद पवार गट काय प्रतिक्रिया देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“तुम्ही ब’ला’त्का’र करा ; तुम्हाला फरार करून टाकू “, विरोधकांचा सरकारला खोचक टोला
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, परिस्थिती हाताबाहेर जात आहे आणि सरकारचे यावर नियंत्रण नाही, सर्व नेते हे पळपुटे आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर पवार स्पष्ट भूमिका मांडत नाहीत. पाठिंबा का विरोध हे देखील सांगत नाहीत. जात बघून मतदान करणार असाल तर तो सर्वात मोठा धोका आहे. मराठ्यांना माझे सांगणे आहे. तत्व पाहिजे यशवंत चव्हाण यांच्यासारखे पण भित्र भागूबाई म्हणजे शरद पवार यांच्यासारखे ते नव्हते. अशी टिका आंबेडकरांनी केलीय.
हेही वाचा…“राणेंवर याआधी दहशत,खून, गुंडागिरी संदर्भात गुन्हे, तात्काळ कारवाई करा”
दरम्यान, राजकारण, भाषण, मोबाईल, बातम्या यातून केवळ द्वेषाच सांगितले जात आहे. ही हिंसाच आहे आणि तेच आता घडत आहे. यातून लैंगिक अत्याचार वाढत आहे. शांतता, शरीराचा आदर पेरला तर या घटना कमी होतील. अत्याचाराच्या घटनामागे आरएसएस, भाजप, बजरंग दल यांची प्रक्षोभक भाषणे आहेत. द्वेषाच्या औषधातून या घटना घडत आहेत. विधानसभेची निवडणूक ही मराठा आणि ओबीसी अशीच आहे. आरक्षण बचाव यात्रा काढळी म्हणून मराठवाडा शांत असल्याचा दावाही त्यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा..पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची ह”त्या ; व्हिडिओ आला समोर
हेही वाचा…बाप्पाच्या आगमनाने काश्मीरमध्ये शांतता नांदेल ; काश्मीर मधील गणेश मंडळांचा विश्वास
हेही वाचा…सुषमा अंधारे विधानसभा लढविणार ? निवडणूकीसाठी ‘हा’ मतदारसंघही ठरला