मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील चार नेत्यांना स्थान मिळाले, मात्र चर्चेत असलेल्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. यावरून मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, भाजपकडून मुंडे भगिनींना सातत्याने डावललं जात आहे, असा आरोप करत त्यांनी राजीनामाअस्त्र वापरले आहे. प्रीतम मुंडेंना न्याय मिळावा, या मागणीसाठी आत्तापर्यंत १०५ विविध स्तरावरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून, यामुळे भाजपत सध्या गोंधळ उडाला आहे.
“मोठा नेता नेहमीच त्याग करत असतो, मंत्रिपदाची मागणी, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत.”
या पार्श्वभूमीवर, आज त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये भेट घेऊन, त्यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या. यावेळी एकदम भावूक होत त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. “माझ्या डोळ्यातील पाणी बघून तुम्ही असे वागला असाल, तर तुमच्या डोळ्यातील पाणी पाहून मी कशी वागू? सांगा! मी हरले, मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी संपणार नाही. कारण तुम्ही आहात,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.
मला अनेकांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी संपले नाही; पंकजा मुंडे कडाडल्या
तसेच, “मला सत्तेची लालसा नाही, कुठलीही अपेक्षा नाही. तुमच्या प्रेमाच्या ऋणात मी आहे. माझ्या राजकारणाचा पाया माझा परिवार महाराष्ट्रात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात आहे. त्यामुळे, मी घर सोडणार नाही आणि मी कार्यकर्त्यांना राजीनामा देऊ देणार नाही. तुमचे राजीनामे नामंजूर आहेत,” असं म्हणत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे नामजूंर केले.
…तेव्हा पंकजा मुंडेंनी अनेकांवर अन्याय केला… आता त्यांच्यावर – विनायक मेटे
दरम्यान, यावर आता इतर पक्षातील नेत्यांच्याही प्रतिक्रिया येत असून, काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना, “पंकजा मुंडेंसारख्या नेत्यावर भाजपत अन्याय होत आहे, हे खरं आहे. त्यामुळे, भाजप नेतृत्वाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं मत थोरात यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही दुजोरा दिला असून, पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होतोय, हे खरंच आहे. त्या मराठावाड्यातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्या वडिलांनी संपूर्ण राज्यात भाजपला वाढवलं त्यामुळे भाजप नेतृत्वाने त्यांची दखल घ्यायला हवी होती, पण असो हा त्यांचा अंतर्गत विषय आहे,” असं वक्तव्य केलं आहे.
Read Also :
- गृहमंत्री अमित शहांचा दौरा: दहा ते दुपारी एक दरम्यान दारे खिडक्या बंद करण्याचे पोलिसांचे आदेश
- नाशिकच्या हाय सिक्युरिटी असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून ५ लाखांच्या नोटा चोरीला
- साखर उद्योगातील समस्यांवर सकारात्मक तोडगा काढा; जयप्रकाश दांडेगावकरांच्या पवारांना सुचना
- “त्यांचेच कौरव-पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ”, काँग्रेसचा भाजपला टोला
- …म्हणून तुम्ही दिलेले राजीनामे, मी नामंजूर करते, पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद