नागपूर : नागपूरमध्ये इंजिनियअरींग करणाऱ्या तरूणाला पायाच्या गुडाघ्यात त्रास होवू लागल्याने त्याने नागपूरच्या नामांकित रुग्णालयात तब्बल दीड वर्षे उपचार घेतले. परंतू, त्रास कमी होण्याऐवजी तो वाढत गेल्याने तरूणाने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात धाव घेतली. एम्स रुग्णालयातील उपचारादरम्यान, नागपूरातील डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे तरूणाच्या पायाचा गुडघा निकम्मा झाल्याचे समोर आले आहे. गु़डघा काम करत नसल्याने तरूणाला उठता-बसता देखिल येत नाही. त्यामुळे, माझ्या आयुष्याचे पुढे काय होणार?, मी कसे जगायचे?, हालगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर काही कारवाई होणार का? अशी आर्तहाक तरूण देवू लागला आहे.
हे पण वाचा: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा
सुमित सुशील तिवारी नावाचा ३० वर्षाचा तरूण आपल्या शिक्षणासाठी नागपूरात इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होता. २०१६ ला त्याच्या पायाच्या गुडघ्यात त्रास होवू लागला. त्यामुळे, मार्गदर्शकाच्या सहाय्याने २ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूरातील सेंट्रल इंडिया इंन्स्टीट्यूट ऑफ हेमॉक्लॉजी अन्ड ऑनक्लॉलॉजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. डॉ. अविनाश पोफली यांनी सुमित तिवारी यांच्यावर तब्बल दीड वर्ष उपचार केले. परंतू, दीड वर्षे उपचार घेवूनही कोणताही फरक जाणवत नसल्याने तिवारीने मुंबईतील लता मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल झाला. लता मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी तरूणाला पाहताच चुकीच्या उपचारामुळे तरूणाचा पायाचा गुडघा कामातून गेल्याचे सांगितले. परंतू, कुठे उपचार घेतल्याचे स्पष्टीकरण विचारले असता तिवारी यांनी नागपूरच्या डॉ. अविनाश पोफली यांचे नाव सांगताच लता मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी अचानक गप्प बसने पसंत केले, अशी माहिती सुमित तिवारी यांनी दिली.
हे पण वाचा: अनिल देशमुख प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात, ठाकरे सरकारची सुप्रीम कोर्टात धाव
गुडघ्यावर कोणताही उपचार घेत नसल्याने तिवारी यांनी थेट दिल्लीतील एम्स रुग्णालयत धाव घेतली. एम्सच्या डॉक्टरांनी विविध चाचण्याकरून आजाराबद्दल जाणून घेतल्यानंतर नागपूरच्या डॉ. अविनाश पोफली यांनी दिलेल्या चुकीच्या उपचारामुळेच तिवारींचा गु़डघ्यातील हिपजॉईन्स (पायातील हाडजळाले) असल्याचे सांगितले. ते ठिक करण्यासाठी मोठी सर्जरी करावी लागणार असल्याचे एम्सच्या डॉ़क्टरांनी सांगितले. परंतू, तरूणाककडे त्यासाठी लागणारा पुरेसा पैसा नसल्याने तरूणाने दिल्लीतून नागपूराकडे प्रस्तान करणे पसंत केले. दरम्यान, नागपूरच्या अविनाश पोफली यांच्या हालगर्जीपणामुळे तरूणाचे आयुष्य उद्धस्त झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे डॉक्टरांवर काही कारवाई होणार का?, राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे याची दखल घेतील का?, की डॉक्टरांना पाठीशी घालतील?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हे पण वाचा: औरंगाबाद पंचायत समितीत राडा; भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण
नागपूरच्या डॉ. अविनाश पोफली यांना मी जाब विचारायला गेलो. तर त्यांनी मला ओळख देखिल दिली नाही. मी त्यांच्यासाठी नविन व्यक्ती असल्याचे दिखावा करत आहेत. मला आता चालता सुद्धा येत नाही. मी माझा उदनिर्वाह कसा करायचा?, माझ्यासारखे राज्यात असे कित्तेक व्यक्ती डॉक्टरांच्या हालगर्दीपणाला बळी पडत आहेत. कोणी यांना न्याय मिळवून देणार का?, की इतरांप्रमाणे यांना सुद्धा पाठीशी घातलार आहात?, असे सांगत सुमित तिवारी यांनी माध्यमांसमोर टाहो फोडला.
Read Also :
- ‘भाजपच्या काळात खासदारही गॅसऐवजी चूल वापरू लागले’; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका
- ‘राज्यात दोन सत्ताकेंद्रं भासवण्याचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा प्रयत्न’
- ईडी म्हणतीये, “अनिल देशमुख कुठे, याची आम्हाला माहिती नाही! आम्ही त्यांची वाट पाहतोय”
- मोठी बातमी : पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज, ठाकरे सरकारचा निर्णय
- केंद्र सरकार जर ओबीसी डाटा देत नसेल, तर घरोघरी जाऊन गोळा करु; विजय वडेट्टीवार म्हणतात…