रायगड : रायगड लोकसभेतून ठाकरे गटाचे उमेदवार माजी मंत्री अनंत गीते यांच्याविरोधात सुनील तटकरेंचा पराभव होणार ? अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सुनील तटकरे यांनी सलग दोन लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांचा पराभव करून जागा आपल्याच ताब्यात ठेवली. यातच आता लोकसभेच्या निवडणुकीत मला कॉंग्रेसच्याच नेत्यांनी मदत केल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यावरून आता राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झालीय.
सुनील तटकरे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात सांगितलं जात होतं की, अलिबाग विधानसभा मतदारसंघात २ ते ५ हजार मतांनी पिछाडीवर राहिन. काही लोकांनी या परिसरात अपप्रचार केला, माझ्याविरोधात वातावरण निर्मिती केली. परंतु आमदार महेंद्र दळवी, भाजप नेते आणि राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या लोकांनी मेहनत घेतली. तसेच कॉंग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी आम्हाला मदत केली. या सर्वांच्या बळावर मला २०१९ च्या निवडणुकीपेक्षा यंदा जास्त मतं मिळाली. अलिबाग मतदारसंघातही याआधीच्या निवडणुकीपेक्षा मला अधिक मतं मिळाली. यंदाच्या निवडणुकीत मला फार चांगलं यश मिळालं.
हेही वाचा…गजा मारणे अन् निलेश लंके भेट, अजित पवार गटाने डिवचलं, म्हणाले..
यातच आता सुनील तटकरे यांच्या दाव्याने महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. कारण या निवडणुकीत कॉंग्रेसने महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी महायुतीच्या उमेदवाराला मदत केली असेल तर त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो. या मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. यात १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी ५०.१७ टक्के मतं सुनील तटकरे यांना मिळाली. तर अनंत गीते यांच्या पारड्यात ४३ टक्के मतं पडली.
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडचे ‘शरद पवार’ माजी आमदार विलास लांडे यांनी ‘ठोकला शड्डू’
हेही वाचा..“गाईने दूध बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं,” भाजपचं अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं
हेही वाचा..“अन्याय होत असेल तर छगन भुजबळांनी त्यांच्या भुजांमधील बळ दाखवावेत”